शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या पाणीपुरवठ्यावर वर्षाला ११४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:05 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी महापालिकेला तब्बल ११४ कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टी वसुलीतून ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी महापालिकेला तब्बल ११४ कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टी वसुलीतून ४० कोटी रुपये प्राप्त होतात. दरवर्षी प्रशासनाला जवळपास ७४ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागते. पाणीपुरवठ्यावर जेवढा खर्च करावा लागतो त्यातील ५० टक्के रक्कम वीजबिलाची आहे. अनधिकृत नळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालिकेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

६० किलोमीटर अंतरावर दोन ठिकाणी पाणी लिफ्ट करून शहरात आणावे लागते. दर महिन्याला साडेचार कोटी रुपये वीजबिलाचे भरावे लागतात. ५५ ते ६० कोटी रुपये वीजबिलावर तर जायकवाडी, मुख्य जलवाहिनी, अंतर्गत जलवाहिन्यांची दुरुस्तीवर १५ कोटी, लिकेजसाठी ३० लाख, पाणी शुद्धीकरणासाठी २ कोटींची रसायन खरेदी, विद्युत पंप दुरुस्ती १ कोटी, केबल जळणे २५ लाख आदी प्रत्येक कामासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. शहराची गरज २०० एमएलडीची असताना १२० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो.

अर्धा टक्के गळती

जायकवाडी आणि शहरात दररोज दुरुस्तीचे काम महापालिकेकडून करण्यात येते. अनेक ठिकाणी व्हाॅल्व मधून ५ टक्के गळती होते. वॉटर ऑडिटनुसार अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या गृहीत धरून ४० टक्के गळतीचे प्रमाण धरण्यात येते. अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

११४

कोटींचे पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट

५५ ते ६०

कोटी दरवर्षी पाणीपुरवठ्याच्या विजेचे बिल

१६०

कर्मचारी पाणीपुरवठा विभागात कार्यरत

कालबाह्य यंत्रणेमुळे खर्चात वाढ

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजना आहेत. दोन्ही योजनांचे आयुष्य यापूर्वीच संपलेले आहे. ठिकठिकाणी गळती त्यानंतर लगेच दुरुस्ती करून योजना कशीबशी सुरू आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत जुने योजना चालण्याशिवाय गत्यंतर नाही.

किरण धांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता.

बीड बायपास

बीड बायपास रोडवर अनेक वर्षांपासून या व्हाॅल्वमधून पाण्याची गळती होते. महापालिकेने अनेकदा दुरुस्ती केली. नागरिक पुन्हा लिकेज निर्माण करतात. ज्या ठिकाणी गळती आहे, तेथे लोखंडी जाळी बसविली होती, पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

रेल्वेस्टेशन

रेल्वेस्टेशन गेट क्रमांक दोन जवळ महापालिकेच्या दोन जलवाहिन्या आहेत. दोन्ही जलवाहिन्यांना व्हाॅल्व बसविण्यात आलेले आहेत. किंचित स्वरूपात पाण्याची गळती याठिकाणी वर्षानुवर्षे सुरू आहे.

अयोध्या नगरी

रेल्वेस्टेशनहून बाबा पेट्रोलपंपाकडे येत असताना डावीकडे अयोध्यानगरी येथे अनेक वर्षांपासून पाण्याची गळती सुरू आहे. महापालिकेने अनेकदा दुरुस्ती केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.