शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

शहराच्या पाणीपुरवठ्यावर वर्षाला ११४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:05 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी महापालिकेला तब्बल ११४ कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टी वसुलीतून ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी महापालिकेला तब्बल ११४ कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टी वसुलीतून ४० कोटी रुपये प्राप्त होतात. दरवर्षी प्रशासनाला जवळपास ७४ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागते. पाणीपुरवठ्यावर जेवढा खर्च करावा लागतो त्यातील ५० टक्के रक्कम वीजबिलाची आहे. अनधिकृत नळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालिकेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

६० किलोमीटर अंतरावर दोन ठिकाणी पाणी लिफ्ट करून शहरात आणावे लागते. दर महिन्याला साडेचार कोटी रुपये वीजबिलाचे भरावे लागतात. ५५ ते ६० कोटी रुपये वीजबिलावर तर जायकवाडी, मुख्य जलवाहिनी, अंतर्गत जलवाहिन्यांची दुरुस्तीवर १५ कोटी, लिकेजसाठी ३० लाख, पाणी शुद्धीकरणासाठी २ कोटींची रसायन खरेदी, विद्युत पंप दुरुस्ती १ कोटी, केबल जळणे २५ लाख आदी प्रत्येक कामासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. शहराची गरज २०० एमएलडीची असताना १२० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो.

अर्धा टक्के गळती

जायकवाडी आणि शहरात दररोज दुरुस्तीचे काम महापालिकेकडून करण्यात येते. अनेक ठिकाणी व्हाॅल्व मधून ५ टक्के गळती होते. वॉटर ऑडिटनुसार अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या गृहीत धरून ४० टक्के गळतीचे प्रमाण धरण्यात येते. अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

११४

कोटींचे पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट

५५ ते ६०

कोटी दरवर्षी पाणीपुरवठ्याच्या विजेचे बिल

१६०

कर्मचारी पाणीपुरवठा विभागात कार्यरत

कालबाह्य यंत्रणेमुळे खर्चात वाढ

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजना आहेत. दोन्ही योजनांचे आयुष्य यापूर्वीच संपलेले आहे. ठिकठिकाणी गळती त्यानंतर लगेच दुरुस्ती करून योजना कशीबशी सुरू आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत जुने योजना चालण्याशिवाय गत्यंतर नाही.

किरण धांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता.

बीड बायपास

बीड बायपास रोडवर अनेक वर्षांपासून या व्हाॅल्वमधून पाण्याची गळती होते. महापालिकेने अनेकदा दुरुस्ती केली. नागरिक पुन्हा लिकेज निर्माण करतात. ज्या ठिकाणी गळती आहे, तेथे लोखंडी जाळी बसविली होती, पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

रेल्वेस्टेशन

रेल्वेस्टेशन गेट क्रमांक दोन जवळ महापालिकेच्या दोन जलवाहिन्या आहेत. दोन्ही जलवाहिन्यांना व्हाॅल्व बसविण्यात आलेले आहेत. किंचित स्वरूपात पाण्याची गळती याठिकाणी वर्षानुवर्षे सुरू आहे.

अयोध्या नगरी

रेल्वेस्टेशनहून बाबा पेट्रोलपंपाकडे येत असताना डावीकडे अयोध्यानगरी येथे अनेक वर्षांपासून पाण्याची गळती सुरू आहे. महापालिकेने अनेकदा दुरुस्ती केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.