शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आरळीच्या आठवडी बाजाराला १११ वर्ष पूर्ण

By admin | Updated: March 12, 2017 23:12 IST

तुळजापूर : तालुक्यातील आरळी (बु़) येथे इंग्रजकालीन राजवटीत १९०५ साली सुरू झालेल्या आठवडा बाजाराला शनिवारी तब्बल १११ वर्षे पूर्ण झाली़

तुळजापूर : तालुक्यातील आरळी (बु़) येथे इंग्रजकालीन राजवटीत १९०५ साली सुरू झालेल्या आठवडा बाजाराला शनिवारी तब्बल १११ वर्षे पूर्ण झाली़ या दिवसाला ग्रामस्थांनीही विविध उपक्रम राबवून ऐतिहासिक बनविले़तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु) या गावाने सामाजिक, सांस्कृतिक परंपरा कायम जोपासली आहे़ इंग्रज राजवटीच्या काळात १९०५ साली गावातील आठवडी बाजारास सुरुवात झाली. याला शनिवारी १११ वर्षे पूर्ण झाली़ मध्यंतरीच्या काळात दुष्काळ, अतिवृष्टी, प्लेगची साथ आल्यानंतर गाव बाहेर वसले़ त्यानंतर हा बाजारही गावाबाहेर स्थलांतरीत झाला. परंतु बाजारची परंपरा खंडित झाली नाही. त्याचे श्रेय गावातील त्या-त्यावेळच्या सुज्ञान गाव कारभाऱ्यांना जाते. त्याचे स्मरण करुन या अखंड आठवडी बाजाराला १११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी येणाऱ्या व्यापाऱ्यांना शाल, श्रीफळ व फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष किरण व्हरकट, उपसरपंच डॉ. व्यंकट पाटील, महोत्सव समिती अध्यक्ष सुनिल पारवे, चेअरमन अनिल जाधव व व्यापारी सुधाकर उकरंडे, ज्ञानेश्वर सरडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.