शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

११०० रोहित्रांची दुरुस्ती; तरीही समस्या कायमच

By admin | Updated: January 31, 2017 00:21 IST

बीड बिघाडाचे प्रमाण अधिक असल्याने आजही रोहित्रांची समस्या जाणवत आहे.

राजेश खराडे बीडरबी हंगामात कृषिपंपांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरिता महावितरणने बीड विभागात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ११५० रोहित्रांची दुरुस्ती केली आहे. असे असूनदेखील बिघाडाचे प्रमाण अधिक असल्याने आजही रोहित्रांची समस्या जाणवत आहे. रोहित्रांच्या गैरवापराचा परिणाम महावितरणच्या यंत्रणेबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकावर झाला आहे.बीड विभागात ६ उपविभाग असून, केवळ बीड अर्बन वगळता इतर उपविभागांमध्ये रोहित्र बिघाडांची संख्या १०० वर गेली होती. रबी हंगाम सुरू होता पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मुबलक पाणी साठा असल्याने शेतकऱ्यांनी अधिकच्या कृषिपंपांचा वापर केल्याने रोहित्रांमधील बिघाड हे नित्याचेच झाले होते. १०० केव्ही रोहित्रावर ५० ते ६० कृषिपंप कार्यरत होऊ शकतात. मात्र, सरासरीपेक्षा दुपटीने त्याचा वापर होत होता. दिवसाकाठी ८ ते १० रोहित्रांमध्ये बिघाड होत असून, संबंधित एजन्सीकडून केवळ २-३ रोहित्रांची दुरुस्ती करून मिळत असे. दुरुस्ती व पुरवठ्यामधील तफावत हंगाम संपला तरी महावितरणला देखील भरून काढता आली नाही. शिवाय, शेतकऱ्यांनीही रोहित्रांचा आवश्यक तेवढाच वापर केला नाही.रोहित्रांची कमतरता असल्याने बीड विभागाने रत्नागिरी, पुणे, कराड, तुळजापूर, धुळे आदी विभागांकडून ६३ व १०० केव्हीएचे रोहित्र मागविले होते. शिवाय वरिष्ठ कार्यालयाकडून नियमितपणे १५५ रोहित्रांचा पुरवठा झाला होता. बीड ग्रामीण व गेवराई उपविभागात सर्वांत कमी वसुली असूनदेखील रोहित्र बिघाडाचे प्रमाण सर्वाधिक होते. रोहित्रांसाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या सुसंवादामुळे रबी हंगाम सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोहित्र वापराबाबत सातत्याने जनजागृती करीत इतर विभागांतून मदतही मागितली असल्याचे कार्यकारी अभियंता जी.बी. घोडके यांनी सांगितले.