शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

११ गावांनी केली टॅँकरची मागणी

By admin | Updated: January 8, 2017 00:13 IST

जाफराबाद : तालुक्यातील तब्बल अकरा गावच्या ग्राम पंचायतींनी जानेवारी महिन्यापासून गावास टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे केली

जाफराबाद : तालुक्यातील तब्बल अकरा गावच्या ग्राम पंचायतींनी जानेवारी महिन्यापासून गावास टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे केली केल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई आढावा बैठकीत देण्यात आली. पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा व निवारणासंदर्भात येथे नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीमधील पिण्याच्या पाणी समस्येबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस सभापती रामताई चौतमोल, कृषी सभापती लिलाबाई लोखंडे, तहसीलदार अनंत पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अरूण चौलवार, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत सांगावे, पाणी पुरवठा अभियंता अंभोरे, झरे, पं. स. सदस्या लिलाबाई लहाने, विभाग प्रमुख, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी वाणखेडा, जानेफळ पंडित, सोनिगरी, भराडखेडा, बेलोरा, येवता, चापणेर, धोंडखेडा, कुंभारी, गोंधनखेडा, चिंचखेडा या अकरा गावांचा जानेवारी ते मार्च या तिमाही अंदाजपत्रकात समावेश करावा तसेच पुढील एप्रिल ते जून या कालावधीत वडाळा, भोरखेडा, पिंपळगाव कड, सावरखेडा, भातोडी, तोंडोळी, गाढेगव्हान, डाहकेवाडी या आठ गावांत संभाव्य टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याची मागणीही सरपंच, ग्रामसेवकांनी केली. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी काही खाजगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार असल्याची माहिती यावेळी पुढे आली. मागील वर्षात तालुक्यातील १०१ गावांपैकी जवळपास ९५ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा पाणी परिस्थिती समाधानकारक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)