शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

११ हजार निराधारांचा ‘आधारवड’

By admin | Updated: August 20, 2016 00:54 IST

बीड : अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही दारिद्र्यरेषेच्या यादीत नाव नसलेल्या अभागी वंचितांना शासकीय योजनांपासून दूर ठेवले जाते. निवडणुका आल्या की त्यांच्या मतांचा वापर करून घेतला जातो.

बीड : अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही दारिद्र्यरेषेच्या यादीत नाव नसलेल्या अभागी वंचितांना शासकीय योजनांपासून दूर ठेवले जाते. निवडणुका आल्या की त्यांच्या मतांचा वापर करून घेतला जातो. मात्र, त्यांच्या समस्यांविषयी कोणीच आवाज उठवत नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.आठ वर्षांपूर्वी संजय गांधी निराधार समितीवर सदस्य म्हणून दिलीप भोसले यांची निवड झाली होती. समितीवर निवड झाल्यानंतर निराधार, वंचित घटकाच्या समस्या जवळून पाहिल्या अन् त्यांचे मन हेलावून गेले. मानधनासाठी बनविण्यात येणाऱ्या प्रस्तावाला चार ते पाच हजार रूपये घेतले जायचे ही वस्तुस्थिती होती. संजय गांधी निराधार समितीवर असतानाही भोसले यांनी या विरोधात आवाज उठवला व ‘शोले’ आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हाभरातून पाच हजारांवर निराधार उपस्थित होते. आंदोलनाचा परिणाम असा झाला की, साडेचार हजार निराधारांचे अनुदान शासनाने क्षुल्लक त्रुटीमुळे बंद केले होते, ते पुन्हा सुरू झाले. याबाबत सांगताना भोसले म्हणाले, बीड शहरात १९ हजार २०० कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. शासनाने त्यांना दारिद्रयरेषेचे प्रमाणपत्र दिलेले आहे. प्रमाणपत्र दिलेले असतानाही यातील ७० हजारांवर निराधारांकडे राशनकार्ड नाही. त्यांना धान्य मिळत नाही ही वस्तुस्थिती आजघडीला निर्माण झालेली आहे. यापुढे शासनाने दारिद्रय रेषेचे राशनकार्ड देऊन या गोरगरीबांना धान्य पुरवठा करावा, हीच आमची यापुढील काळातील मागणी असल्याचे सांगत, ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत निराधार संघर्ष समितीच्या माध्यमातून मी ११ हजार लोकांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. सध्याचे सरकार हुकूमी राजवटीप्रमाणे कारभार करीत आहे. शासन धोरणाचा गोरगरीब नागरिकांवर विपरित परिणाम होत आहे. शासनाने निराधारांच्या मानधनात केलेली वाढ फसवी आहे. यापुढील काळात सरसगट निराधार लाभार्थ्यांना प्रत्येकी हजार रूपये मानधन द्यावे. आतापर्यंत समाजकार्यातून लढा दिला, यापुढे नगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)