शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३७ लाख लोकांच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ११ जणांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ...

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे, पण या कार्यालयात केवळ ११ अधिकारी, कर्मचारी असल्याने ही सुरक्षा फक्त कागदावरच सशक्त आहे.

पौष्टिक, शुद्ध, अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. त्यांना शुद्ध अन्न मिळावे याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. ३७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स आहेत. त्यातील अधिकृत हजारांच्या आत आहेत. तेवढेच मिठाई विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ उत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या तपासणीचा भार केवळ आठ अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात तीन हजार औषधी दुकाने आहेत. त्यांच्या तपासणीसाठी तीन औषध निरीक्षक आहेत.

मागील अनेक वर्षांपासून या विभागात पद भरती झालीच नाही. उपलब्ध अधिकऱ्याकडून कसेबसे काम करून घेतले जात आहे. यामुळे अन्न व सुरक्षा अधिकारी असो व औषधी निरीक्षक प्रत्येक दुकानापर्यंत जाऊ शकत नाही.

चौकट

संपूर्ण औषधी दुकानाची तपासणी करणे अशक्य

जिल्ह्यात सुमारे तीन हजार औषधी दुकाने आहेत. मात्र, त्याची तपासणी करण्यासाठी अवघे तीन औषधी निरीक्षक आहेत. एकूण पदे सात आहेत. जिल्ह्याचा विचार केला तर १५ औषधी निरीक्षकही कमी पडतात. तेथे तीन औषध निरीक्षक किती औषधी दुकानाची तपासणी करणार?

चौकट

हॉटेलची तपासणी वाऱ्यावरच

जिल्ह्यात आठ अन्न व सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्यावर पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स तपासणे, तेथील अन्न, पाणी, स्वछता तपासणे हे सुद्धा अशक्यच आहे. जेथे काही घटना घडते किंवा माहिती मिळते तिथे कारवाई केली जाते.

चौकट

कोर्ट कचऱ्या करण्यातच वेळ जास्त जातो

एक तर औषधी व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या कमी. त्यात दर तीन वर्षाने त्यांच्या होणाऱ्या बदल्या. त्यात मागे ज्या जिल्ह्यातून बदली होऊन अन्न सुरक्षा अधिकारी येतात. तेथे ज्या कारवाई केलेल्या असतात, त्यांच्या न्यायालयात याचिका सुरू असतात. त्यासाठी तेथील न्यायालयात हजर राहावे लागते. या कामाचा ताणही वाढतो.

चौकट

रिक्तपद भरती करणे आवश्यक

१९९४ मध्ये जिल्ह्यात १२ अन्न निरीक्षक होते. त्यानंतर लोकसंख्या वाढली, परंतु अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी आणखी कमी झाली. जेथे १५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तेथे केवळ आठ पदे भरली आहेत. रिक्तपदे भरण्याची आवश्यकता आहे.

मिलिंद शहा

सहआयुक्त, अन्न प्रशासन

----

आकडेवारी

जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८

जिल्ह्यात हॉटेल्स पाच हजार

अन्न सुरक्षा अधिकारी ८

जिल्ह्यात औषधी दुकाने ३ हजार

औषधी निरीक्षक ३