शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जिल्ह्यातील ३७ लाख लोकांच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ११ जणांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ...

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे, पण या कार्यालयात केवळ ११ अधिकारी, कर्मचारी असल्याने ही सुरक्षा फक्त कागदावरच सशक्त आहे.

पौष्टिक, शुद्ध, अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. त्यांना शुद्ध अन्न मिळावे याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. ३७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स आहेत. त्यातील अधिकृत हजारांच्या आत आहेत. तेवढेच मिठाई विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ उत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या तपासणीचा भार केवळ आठ अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात तीन हजार औषधी दुकाने आहेत. त्यांच्या तपासणीसाठी तीन औषध निरीक्षक आहेत.

मागील अनेक वर्षांपासून या विभागात पद भरती झालीच नाही. उपलब्ध अधिकऱ्याकडून कसेबसे काम करून घेतले जात आहे. यामुळे अन्न व सुरक्षा अधिकारी असो व औषधी निरीक्षक प्रत्येक दुकानापर्यंत जाऊ शकत नाही.

चौकट

संपूर्ण औषधी दुकानाची तपासणी करणे अशक्य

जिल्ह्यात सुमारे तीन हजार औषधी दुकाने आहेत. मात्र, त्याची तपासणी करण्यासाठी अवघे तीन औषधी निरीक्षक आहेत. एकूण पदे सात आहेत. जिल्ह्याचा विचार केला तर १५ औषधी निरीक्षकही कमी पडतात. तेथे तीन औषध निरीक्षक किती औषधी दुकानाची तपासणी करणार?

चौकट

हॉटेलची तपासणी वाऱ्यावरच

जिल्ह्यात आठ अन्न व सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्यावर पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स तपासणे, तेथील अन्न, पाणी, स्वछता तपासणे हे सुद्धा अशक्यच आहे. जेथे काही घटना घडते किंवा माहिती मिळते तिथे कारवाई केली जाते.

चौकट

कोर्ट कचऱ्या करण्यातच वेळ जास्त जातो

एक तर औषधी व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या कमी. त्यात दर तीन वर्षाने त्यांच्या होणाऱ्या बदल्या. त्यात मागे ज्या जिल्ह्यातून बदली होऊन अन्न सुरक्षा अधिकारी येतात. तेथे ज्या कारवाई केलेल्या असतात, त्यांच्या न्यायालयात याचिका सुरू असतात. त्यासाठी तेथील न्यायालयात हजर राहावे लागते. या कामाचा ताणही वाढतो.

चौकट

रिक्तपद भरती करणे आवश्यक

१९९४ मध्ये जिल्ह्यात १२ अन्न निरीक्षक होते. त्यानंतर लोकसंख्या वाढली, परंतु अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी आणखी कमी झाली. जेथे १५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तेथे केवळ आठ पदे भरली आहेत. रिक्तपदे भरण्याची आवश्यकता आहे.

मिलिंद शहा

सहआयुक्त, अन्न प्रशासन

----

आकडेवारी

जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८

जिल्ह्यात हॉटेल्स पाच हजार

अन्न सुरक्षा अधिकारी ८

जिल्ह्यात औषधी दुकाने ३ हजार

औषधी निरीक्षक ३