शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

जिल्ह्यातील ३७ लाख लोकांच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ११ जणांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ...

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे, पण या कार्यालयात केवळ ११ अधिकारी, कर्मचारी असल्याने ही सुरक्षा फक्त कागदावरच सशक्त आहे.

पौष्टिक, शुद्ध, अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. त्यांना शुद्ध अन्न मिळावे याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. ३७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स आहेत. त्यातील अधिकृत हजारांच्या आत आहेत. तेवढेच मिठाई विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ उत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या तपासणीचा भार केवळ आठ अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात तीन हजार औषधी दुकाने आहेत. त्यांच्या तपासणीसाठी तीन औषध निरीक्षक आहेत.

मागील अनेक वर्षांपासून या विभागात पद भरती झालीच नाही. उपलब्ध अधिकऱ्याकडून कसेबसे काम करून घेतले जात आहे. यामुळे अन्न व सुरक्षा अधिकारी असो व औषधी निरीक्षक प्रत्येक दुकानापर्यंत जाऊ शकत नाही.

चौकट

संपूर्ण औषधी दुकानाची तपासणी करणे अशक्य

जिल्ह्यात सुमारे तीन हजार औषधी दुकाने आहेत. मात्र, त्याची तपासणी करण्यासाठी अवघे तीन औषधी निरीक्षक आहेत. एकूण पदे सात आहेत. जिल्ह्याचा विचार केला तर १५ औषधी निरीक्षकही कमी पडतात. तेथे तीन औषध निरीक्षक किती औषधी दुकानाची तपासणी करणार?

चौकट

हॉटेलची तपासणी वाऱ्यावरच

जिल्ह्यात आठ अन्न व सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्यावर पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स तपासणे, तेथील अन्न, पाणी, स्वछता तपासणे हे सुद्धा अशक्यच आहे. जेथे काही घटना घडते किंवा माहिती मिळते तिथे कारवाई केली जाते.

चौकट

कोर्ट कचऱ्या करण्यातच वेळ जास्त जातो

एक तर औषधी व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या कमी. त्यात दर तीन वर्षाने त्यांच्या होणाऱ्या बदल्या. त्यात मागे ज्या जिल्ह्यातून बदली होऊन अन्न सुरक्षा अधिकारी येतात. तेथे ज्या कारवाई केलेल्या असतात, त्यांच्या न्यायालयात याचिका सुरू असतात. त्यासाठी तेथील न्यायालयात हजर राहावे लागते. या कामाचा ताणही वाढतो.

चौकट

रिक्तपद भरती करणे आवश्यक

१९९४ मध्ये जिल्ह्यात १२ अन्न निरीक्षक होते. त्यानंतर लोकसंख्या वाढली, परंतु अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी आणखी कमी झाली. जेथे १५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तेथे केवळ आठ पदे भरली आहेत. रिक्तपदे भरण्याची आवश्यकता आहे.

मिलिंद शहा

सहआयुक्त, अन्न प्रशासन

----

आकडेवारी

जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८

जिल्ह्यात हॉटेल्स पाच हजार

अन्न सुरक्षा अधिकारी ८

जिल्ह्यात औषधी दुकाने ३ हजार

औषधी निरीक्षक ३