शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

जिल्ह्यातील ३७ लाख लोकांच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ११ जणांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी ...

औरंगाबाद : जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८वर गेली आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या अन्न व औषधी सुरक्षेची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे, पण या कार्यालयात केवळ ११ अधिकारी, कर्मचारी असल्याने ही सुरक्षा फक्त कागदावरच सशक्त आहे.

पौष्टिक, शुद्ध, अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. त्यांना शुद्ध अन्न मिळावे याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. ३७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स आहेत. त्यातील अधिकृत हजारांच्या आत आहेत. तेवढेच मिठाई विक्रेते आहेत. खाद्यपदार्थ उत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या तपासणीचा भार केवळ आठ अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात तीन हजार औषधी दुकाने आहेत. त्यांच्या तपासणीसाठी तीन औषध निरीक्षक आहेत.

मागील अनेक वर्षांपासून या विभागात पद भरती झालीच नाही. उपलब्ध अधिकऱ्याकडून कसेबसे काम करून घेतले जात आहे. यामुळे अन्न व सुरक्षा अधिकारी असो व औषधी निरीक्षक प्रत्येक दुकानापर्यंत जाऊ शकत नाही.

चौकट

संपूर्ण औषधी दुकानाची तपासणी करणे अशक्य

जिल्ह्यात सुमारे तीन हजार औषधी दुकाने आहेत. मात्र, त्याची तपासणी करण्यासाठी अवघे तीन औषधी निरीक्षक आहेत. एकूण पदे सात आहेत. जिल्ह्याचा विचार केला तर १५ औषधी निरीक्षकही कमी पडतात. तेथे तीन औषध निरीक्षक किती औषधी दुकानाची तपासणी करणार?

चौकट

हॉटेलची तपासणी वाऱ्यावरच

जिल्ह्यात आठ अन्न व सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्यावर पाच हजारांपेक्षा अधिक लहान-मोठ्या हॉटेल्स तपासणे, तेथील अन्न, पाणी, स्वछता तपासणे हे सुद्धा अशक्यच आहे. जेथे काही घटना घडते किंवा माहिती मिळते तिथे कारवाई केली जाते.

चौकट

कोर्ट कचऱ्या करण्यातच वेळ जास्त जातो

एक तर औषधी व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या कमी. त्यात दर तीन वर्षाने त्यांच्या होणाऱ्या बदल्या. त्यात मागे ज्या जिल्ह्यातून बदली होऊन अन्न सुरक्षा अधिकारी येतात. तेथे ज्या कारवाई केलेल्या असतात, त्यांच्या न्यायालयात याचिका सुरू असतात. त्यासाठी तेथील न्यायालयात हजर राहावे लागते. या कामाचा ताणही वाढतो.

चौकट

रिक्तपद भरती करणे आवश्यक

१९९४ मध्ये जिल्ह्यात १२ अन्न निरीक्षक होते. त्यानंतर लोकसंख्या वाढली, परंतु अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी आणखी कमी झाली. जेथे १५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तेथे केवळ आठ पदे भरली आहेत. रिक्तपदे भरण्याची आवश्यकता आहे.

मिलिंद शहा

सहआयुक्त, अन्न प्रशासन

----

आकडेवारी

जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख ९५ हजार ९२८

जिल्ह्यात हॉटेल्स पाच हजार

अन्न सुरक्षा अधिकारी ८

जिल्ह्यात औषधी दुकाने ३ हजार

औषधी निरीक्षक ३