शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे औशात ११ कोटींचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:16 IST

लातूर : लातूर व औसा तालुक्यात १५ व १६ मार्च रोजी रोजी गारपीट झाली होती.

लातूर : लातूर व औसा तालुक्यात १५ व १६ मार्च रोजी रोजी गारपीट झाली होती. या गारपिटीत औसा तालुक्यात १६ हजार २३९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ११.६४ कोटी रुपयांना फटका बसला आहे, तर लातूर तालुक्यात १० हजार ७४१ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्याचा अद्याप पाहणी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला नसल्याने नुकसानीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला नाही.लातूर जिल्ह्यातील औसा व लातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा, ज्वारी, करडई, केळी, हळद, भुईमूग व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी राज्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी अद्याप लातूर तालुक्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. कृृषी, महसूलच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार औसा तालुक्यातील पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, १६ हजार २५९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या तालुक्यात गहू ३३१७.३२ हेक्टर, हरभरा ४०२४.१ हेक्टर, ज्वारी ५८४६.०९ हेक्टर,करडई ९७०.६४ हेक्टर, केळी ३.४० हेक्टर, हळद ३.५०, भुईमूग २८१.३८ हेक्टर व इतर क्षेत्र ४५७.७५ हेक्टर बाधित झाले आहे. ११ कोटी ६४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाकडे औसा तालुक्याचा हा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, शासनाकडे नुकसानभरपाईसाठी ११.६४ लाखांची मागणी केली जाणार आहे.