शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

गारपिटीमुळे औशात ११ कोटींचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:16 IST

लातूर : लातूर व औसा तालुक्यात १५ व १६ मार्च रोजी रोजी गारपीट झाली होती.

लातूर : लातूर व औसा तालुक्यात १५ व १६ मार्च रोजी रोजी गारपीट झाली होती. या गारपिटीत औसा तालुक्यात १६ हजार २३९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ११.६४ कोटी रुपयांना फटका बसला आहे, तर लातूर तालुक्यात १० हजार ७४१ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्याचा अद्याप पाहणी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला नसल्याने नुकसानीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला नाही.लातूर जिल्ह्यातील औसा व लातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा, ज्वारी, करडई, केळी, हळद, भुईमूग व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी राज्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी अद्याप लातूर तालुक्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. कृृषी, महसूलच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार औसा तालुक्यातील पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, १६ हजार २५९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या तालुक्यात गहू ३३१७.३२ हेक्टर, हरभरा ४०२४.१ हेक्टर, ज्वारी ५८४६.०९ हेक्टर,करडई ९७०.६४ हेक्टर, केळी ३.४० हेक्टर, हळद ३.५०, भुईमूग २८१.३८ हेक्टर व इतर क्षेत्र ४५७.७५ हेक्टर बाधित झाले आहे. ११ कोटी ६४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाकडे औसा तालुक्याचा हा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, शासनाकडे नुकसानभरपाईसाठी ११.६४ लाखांची मागणी केली जाणार आहे.