शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

खड्डेमय रस्त्याचे १०७ बळी

By admin | Updated: July 17, 2017 00:46 IST

जालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत. यात १०७ जणांनी जीव गमावला असून, १३६ जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील वाढते अपघातांचे प्रमाण ही गंभीर समस्या ठरत आहे.जिल्ह्यातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन, भरधाव वाहन चालविणे या प्रकारांमुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य व अन्य रस्त्यांवर एक जानेवारी ते १० जुलै २०१७ दरम्यान अपघाताच्या २०६ घटना घडल्या आहेत. वडीगोद्री, अंकुशनगर या भागातून जाणाऱ्या सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या सात घटनांमध्ये तीनजण ठार झाले असून, आठ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जालना-औरंगाबाद, जालना-भोकरदन, जालना-परभणी, जालना-बीड, जालना-बुलडाणा, सिंदखेडराजा या राज्यमार्गावर १०७ घटना घडल्या आहेत. यात ६० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ८३ गंभीर तर १४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर ९२ अपघातांमध्ये ४४ जणांचा बळी गेला आहे. तर ६५ जण जखमी झाले आहेत. अपघाती मृतांमध्ये पुरुषांची संख्या १०१ असून, घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अवैध वाळू वाहतुकीमुळे भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी आहे. अपघात वाढीचे हे एक प्रमुख कारण असून, याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.