शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
2
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
3
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
6
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
7
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
8
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
9
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
10
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
11
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
12
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
13
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
14
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
15
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
December Born Astro: डिसेंबरकर दिसायला आकर्षक, पण आळशीपणामुळे गमावतात अनेक संधी!
18
रतन टाटांच्या मृत्युपत्रात सातासमुद्रापलीकडील व्हिला; खरेदीसाठी कोण इच्छुक? पैसे कोणाला मिळणार?
19
Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
20
नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्याचे १०७ बळी

By admin | Updated: July 17, 2017 00:46 IST

जालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत. यात १०७ जणांनी जीव गमावला असून, १३६ जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील वाढते अपघातांचे प्रमाण ही गंभीर समस्या ठरत आहे.जिल्ह्यातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन, भरधाव वाहन चालविणे या प्रकारांमुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य व अन्य रस्त्यांवर एक जानेवारी ते १० जुलै २०१७ दरम्यान अपघाताच्या २०६ घटना घडल्या आहेत. वडीगोद्री, अंकुशनगर या भागातून जाणाऱ्या सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या सात घटनांमध्ये तीनजण ठार झाले असून, आठ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जालना-औरंगाबाद, जालना-भोकरदन, जालना-परभणी, जालना-बीड, जालना-बुलडाणा, सिंदखेडराजा या राज्यमार्गावर १०७ घटना घडल्या आहेत. यात ६० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ८३ गंभीर तर १४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर ९२ अपघातांमध्ये ४४ जणांचा बळी गेला आहे. तर ६५ जण जखमी झाले आहेत. अपघाती मृतांमध्ये पुरुषांची संख्या १०१ असून, घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अवैध वाळू वाहतुकीमुळे भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी आहे. अपघात वाढीचे हे एक प्रमुख कारण असून, याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.