शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:45 IST

औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले.

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले. त्यातून २५४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागांमुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्र ठरणार आहे.

एमआयडीसी’ने २०१५ ते २०१८ या कालावधीत १७५ भूखंडांचे वाटप केले आहे. यामध्ये सर्वाधिक भूखंड हे २०१६ मध्ये वाटप झाले. तर भूखंड वाटपातून सर्वाधिक गुंतवणूक ही २०१७ मध्ये १५६ कोटी रुपयांची झाली आहे. २०१८ या वर्षात आतापर्यंत ४३ भूखंड वाटप करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औरंगाबाद  प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. चार वर्षांत ‘एमआयडीसी’तर्फे आॅनलाईन आणि ई-बिडिंगद्वारे हे भूखंड वाटप झाले आहेत. 

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘डीएमआयसी’अंतर्गत  स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची उभारणी गतीने सुरू आहे. ‘एमआयडीसी’क डे आजघडीला उद्योगांसाठी औरंगाबाद परिसरातील लाडगाव, करमाड, पैठण, बिडकीन याठिकाणी सुमारे १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. कन्नड, सटाणा, जयपूर, गेवराई, अतिरिक्त जालना टप्पा-४ येथील औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी आणखी जागा उपलब्ध होणार आहे. 

मुंबई, पुण्यासह अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये मागणी अधिक आणि जागा कमी, अशी अवस्था आहे. आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागेमुळे औरंगाबादकडे उद्योगांचा ओढा वाढत आहे. देश-विदेशातील कंपन्या गुंतवणुकीसाठी रुची दर्शवीत आहेत. औरंगाबादेत कार्यरत उद्योगही नवीन जागा घेऊन उद्योगांचा विस्तार करण्यास प्राधान्य देत आहेत.

३,७९३ जणांना रोजगारचार वर्षांत झालेल्या भूखंड वाटपातून सुमारे ३ हजार ७९३ जणांच्या रोजगार निर्मितीला चालना मिळाली. यामध्ये २०१५ मध्ये भूखंड घेतलेल्या अनेकांचे उद्योग सुरू झाले. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्धही झाले. २०१७, २०१८ या वर्षात भूखंड घेतलेल्यांची उद्योग उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून आगामी कालावधीत रोजगार वाढेल.

औरंगाबादकडे वाढता कल मुंबई, पुणे याठिकाणी जागा कमी असल्याने औरंगाबादकडे उद्योगांचा कल वाढत आहे. शहर परिसरात १० हजार एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्रबिंदू ठरत आहे.-सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

टॅग्स :MIDCएमआयडीसीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरShendra MIDCशेंद्रा एमआयडीसीChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसी