शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

१० विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: February 4, 2017 00:37 IST

पाटोदा :दासखेड येथे ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी उघडण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहामधील १० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

पाटोदा : तालुक्यातील दासखेड येथे ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी उघडण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहामधील १० विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळच्या जेवणानंतर विषबाधा झाली. या विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून दुपारनंतर सुटी देण्यात आली.जिल्ह्यात सहा लाखांवर अधिक ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये यासाठी हंगामी वसतिगृहे उभारण्यात आलेली आहेत. या अंतर्गत दासखेड येथे देखील वसतिगृह सुरू असून, त्यात ९० विद्यार्थ्यांची सोय करण्यात आलेली आहे. पहिली ते सावतीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. नित्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांना बटाट्याची भाजी व बाजरीची भाकरी जेवणात दिली होती. एकूण ७० हून अधिक विद्यार्थी जेवणासाठी उपस्थित होते. जेवणानंतर १० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर वसतिगृह चालक व ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना तातडीने खासगी वाहनातून पाटोदा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साजिया बेगम यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार केले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्या सर्वांना सुटी देण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.प्रभारी मुख्याध्यापक सुटीवरहंगामी वसतिगृहांवर मुख्याध्यापकांचे नियंत्रण असते. शालेय समितीमार्फत वसतिगृहे चालविली जातात. विद्यार्थी नातेवाईकांकडे वास्तव्यास ठेवून वसतिगृहात केवळ जेवण व इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत डोके हे गेल्या काही दिवसांपासून विनापरवाना सुटीवर आहेत. गटशिक्षणाधिकारी डी. एच. बोंदार्डे म्हणाले, चौकशी करून कारवाई केली जाईल. (वार्ताहर)