शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे १०% पाणी जमिनीत

By admin | Updated: May 26, 2016 00:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भूजल पातळी दरवर्षी दीड ते दोन मीटरने खालावत आहे. औरंगाबादेत दरवर्षी होणाऱ्या सरासरी ७०० मि. मी. पावसापैकी फक्त १० टक्केच पाणी जमिनीत जाते. चेन्नई शहराप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आल्यावरच परिस्थितीत सुधारणा होईल. अन्यथा शहर बकाल होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा भूजलशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांनी दिला.महापालिकेतर्फे बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अय्युब खान, प्रभारी सहायक संचालक नगररचना वसंत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना अशोक तेजनकर यांनी सांगितले की, चेन्नई शहराला आंध्र प्रदेशातून पाणी न्यावे लागत होते. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीची केली. अवघ्या काही वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला. औरंगाबादेतही असाच कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांच्या विधानाला महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाठिंबा दर्शविला. जलस्तर ३००-४०० फूट खोल गेला आहे. औरंगाबाद शहरातील ३० टक्के नागरिक या भूजलाचा वापर करतात. हे पाणी बंद झाल्यास महापालिकेला प्रत्येक नागरिकाला पाणी देणे अवघड होऊन जाईल. शहरात १५४ विहिरी मनपाच्या आहेत. त्यातील ९१ विहिरींना चांगले पाणी आहे. ते शुद्ध करून वापरता येऊ शकते. अनेक विहिरींचे पुनर्भरण करावे लागेल. आर्किटेक्ट असोसिएशनचे योगेंद्र बल्लाळ, स्वयंसेवी संस्थेच्या मीनल नाईक, सुकुमार कुलकर्णी, श्रीरंग फरकाडे यांनीही मार्गदर्शन केले. मीनल नाईक यांनी कायमस्वरूपी समिती नेमण्याची सूचना केली. महापौरांनी त्याला सहमती दर्शविली. सूत्रसंचालन वसंत निकम यांनी तर आभार उपायुक्त अय्युब खान यांनी मानले.