शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

औरंगाबादचे १० कर्मचारी पळविले नागपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:21 IST

मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने औरंगाबादेत अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली खरी; परंतु गेल्या १७ वर्षांपासून आजपर्यंत या प्रयोगशाळेला पुरेसे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने औरंगाबादेत अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली खरी; परंतु गेल्या १७ वर्षांपासून आजपर्यंत या प्रयोगशाळेला पुरेसे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही. अपुºया मनुष्यबळावर तग धरून असलेल्या या प्रयोगशाळेचे तब्बल १० कर्मचाºयांना नागपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या प्रयोगशाळेकडे वर्ग करण्यात आले आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ व या विभागातील लोकप्रतिनिधींच्या अथक परिश्रमाने स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेला येनकेनप्रकारेण स्थापनेपासूनच नाट लागला आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.संपूर्ण राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनामार्फत चालविल्या जाणाºया मुंबई आणि औरंगाबाद या दोनच ठिकाणी अन्न व औषध नियंत्रण प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आता तिसरी प्रयोगशाळा नागपूर येथे स्थापन झाली आहे. या प्रयोगशाळेत भेसळयुक्त अन्न, बोगस सौंदर्य प्रसाधने व औषधांच्या नमुन्याचे विश्लेषण केले जाते. सन २००० मध्ये औरंगाबादेत स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेसाठी विविध १११ पदांची मागणी होती; परंतु शासनाने अवघ्या ४८ पदांवर या प्रयोगशाळेची बोळवण केली, असे असले तरी मंजूर केलेली ४८ पदेदेखील आजपर्यंत कधीही पूर्णपणे भरण्याचे औदार्य शासनाने दाखविले नाही. परिणामी, जास्त दिवस पदे रिक्त राहिल्यामुळे मंजूर ४८ पैकी ७ पदे व्यपगत झाली. त्यामुळे ४१ पदांपैकी अवघी २९ पदे भरण्यात आली