शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

विष्णूपुरीत १० दलघमी पाणी

By admin | Updated: June 23, 2014 00:04 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १०़ ४१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १०़ ४१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़ पावसाचे दोन नक्षत्र कोरडे गेल्यानंतर प्रकल्पातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे़ मागील वर्षी १ ते १९ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी़ तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ मात्र यंदा आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मि. मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा भरण्याऐवजी कमी होत चालला आहे़ सध्या १०़४१ दलघमी साठा असून ३४८़३० पाणीपातळी आहे़ प्रकल्पात एकूण १३़२६ टक्के साठा आहे़ उपलब्ध साठा जुलैअखेर पर्यंत पुरणार असला तरी पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन ते तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता़ उपलब्ध पाणी जून महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ १ मार्च रोजी विष्णूपुरी प्रकल्पात २३ दलघमी पाणीसाठा तर १४ मार्च रोजी प्रकल्पात ३६़५७ दलघमी साठा होता़ तर २६ मे रोजी १८ दलघमी पाणी उपलब्ध होते़मागील वर्षी २०१३ मध्ये पावसाने साथ दिल्यामुळे जवळपास पेरण्या संपल्या होत्या़ यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे़ मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे आर्द्रा नक्षत्राकडे डोळे लागले आहेत़त्यात काही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेने पेरण्याही उरकल्या आहेत़ त्यांची मात्र गोची झाली आहे़ (प्रतिनिधी) विष्णूपुरी प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावरवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विष्णूपुरी प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावर आहे़ प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित असल्याने रात्रीच्या वेळी हा परिसर असुरक्षित आहे़ सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रकल्पाच्या सुरक्षेसोबतच सुविधांच्या संदर्भात लक्ष देणे आवश्यक आहे़ परंतु याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना असुविधांना सामोरे जावे लागत आहे़ याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे़