शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

इलेक्ट्रिकल वाहनांसाठी शहरात १० चार्जिंग स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : देशभरातील महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ...

औरंगाबाद : देशभरातील महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात शहरात १० ठिकाणी स्टेशन उभारण्यासंदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत महापालिकेची चर्चा झाल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

इंधनाचे वाढते दर नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन देत आहे. यासाठी देशात विविध शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. देशातील किमान प्रमुख २५ शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी केली जात आहे. राजधानी दिल्लीत प्रत्येक तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. महाराष्ट्रात ठाणे शहरात शुक्रवारी ऑटो रिक्षांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाले. या पार्श्‍वभूमीवरच पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही इलेक्ट्रिकल वाहनांसाठी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.

टाटा कंपनीने दिली सहमती

शहरात दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात नुकतीच टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी हा प्रकल्प औरंगाबाद शहरात राबविण्यास सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित कंपनी व पालिका यांच्यात सामंजस्य करार होईल.

आस्तिक कुमार पांडेय, प्रशासक, महापालिका.

दहा ठिकाणी जागेचा शोध सुरू

शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यापासून पहिले तीन महिने शहरवासीयांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा ठिकाणी हे स्टेशन उभारण्यासाठी जागांची निवडही लवकरच केली जाणार आहे.