शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या ...

औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थांना प्रत्येकी एक गणवेश शिवून दिला जाणार आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी गणवेश वाटप केले जातात. गेल्यावर्षी १ लाख ४३ हजार ७७१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशाचे वाटप करण्यात आले होते.

यावर्षी जिल्ह्याला ८ कोटी ७७ लाख ९० हजार २०० रुपयांचा निधी गणवेशासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजूर आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने २० नोव्हेंबरला राज्य शासनाने दोन ऐवजी एकच गणवेश वाटपाची सूचना दिली आहे. त्यासाठी १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थांना प्रत्येकी एक गणवेश वाटपासाठी ४ कोटी ३८ लाख ९५ हजार एवढा निधी लागणार आहे. एका ड्रेससाठी सुमारे तीनशे रुपये खर्च अपेक्षित आहे.

---

३ कोटी ४२ लाख रुपये निधी प्राप्त

शासनाकडून सर्व शिक्षा अभियानाकडे ३ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यामुळे आणखी ६९.७ लाख रुपये निधीची आवश्यकता भासणार आहे. गणवेश वाटपासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्याकडे पाठविण्यात आली असून, पुढील प्रक्रिया त्यांच्या निर्णयानुसार होईल, असे सोज्वल जैन यांनी सांगितले.

---

शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच वितरण

शाळा व्यवस्थापन समितीला कापड व शिलाईसाठी निधी दिला जातो. त्यामुळे वितरणाची जबाबदारी शाळातील संबंधित शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती निधी वितरित झाल्यावर कापड खरेदी करतील. स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने अद्याप निर्णय झालेला नाही. निधी समितीकडे वर्ग झाल्यावर कापड खरेदी व विद्यार्थ्यांचे कापड शिवण्यासाठी माप घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

---

कोट

अद्याप शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. गणवेशासाठी मिळालेला निधी ९ तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाला पुरणारा नाही. आणखी ६९.७ लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत औरंगाबाद ग्रामीण वगळून इतर ८ तालुक्यांतील शाळा समित्यांना निधी देऊन गणवेश शिवण्याचे व त्यानंतर वितरणाचे काम लवकरच सुरू करू. शाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित निधीही मिळेल. त्यावेळी औरंगाबाद तालुक्यातही गणवेश वाटप प्रक्रिया सुरू करू.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी

---

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी

--

मुले : ४१,४५७

मुली : १,०४,८६०

---

१,४६,३१७

गणवेश लागणार

---

२,८७,५४२

मागील वर्षी केले गणवेश वाटप

---