शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

पोलीस विभागाच्या पालखीने वृक्षलागवडीचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 01:03 IST

चार कोटींच्या उद्दिष्टापैकी महाराष्ट्राने वनमहोत्सवाच्या चौथ्या दिवशीच अडीच कोटीपर्यंत मजल मारली आहे.

उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : मुबलक रोपांची उपलब्धतालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चार कोटींच्या उद्दिष्टापैकी महाराष्ट्राने वनमहोत्सवाच्या चौथ्या दिवशीच अडीच कोटीपर्यंत मजल मारली आहे. चंद्रपूर जिल्हा देखील २९ लाखांच्या शासकीय उद्दिष्टाच्या जवळ पोहचला आहे. मंगळवारी चौथ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात सायंकाळपर्यंत २६ लाख २२ हजार वृक्षलागवड झाली होती. पोलीस दलाच्या वृक्षदिंडीने मंगळवारी आणखी उत्साह निर्माण केला. जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या नेतृत्वात सकाळी वृक्षदिंडीने शहर दुमदुमले. बुधवारी पाचव्या दिवशीच जिल्हा २९ लाखांच्या शासकीय उद्दिष्टाला पार करण्याची शक्यता आहे. या विक्रमी वृक्षलागवडीचे स्वागत करीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी राज्याच्या अन्य जिल्ह्यापेक्षा अधिक वृक्षलागवड होईल, याची खात्री आहे. वनविभागाच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. जिल्हास्तरावर मंगळवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील विविध विभागाचा आढावा घेतला. मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी वनविभागामार्फत आतापर्यंत १८ लाख ५५ हजार ७८२ वृक्षलागवड झाल्याचे सांगितले. तर सर्व यंत्रणांमार्फत ७ लाख ६७ हजार वृक्षलागवड चार दिवसात झाल्याचे सांगितले. महानगरपालिकेने देखील आतापर्यंत २२ हजार ५६३ झाडे लावली आहेत. पुढील तीन दिवसात या मोहिमेत बहुसंख्य नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने देखील आपल्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरु केली ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरु असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेने आतापर्यंत २ लक्ष ५५ हजार १४९ वृक्षलागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस दलाने केली उद्दिष्टपूर्तीपोलीस विभागाने मंगळवारी सकाळी शिस्तबध्द पध्दतीने वृक्षपालखी काढत जनतेमध्ये वृक्षलागवडीचे वातावरण निर्माण केले आहे. शहराच्या मुख्य भागातून पोलीस लाईन परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात वृक्षलागवड करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाणे, सहा उपविभागीय कार्यालयात वृक्षलागवड सुरु आहे. मानवधर्म जोडण्यासाठी सर्वांनी वृक्षलागवड करावी, असे आवाहन एसपी ठाकर यांनी केले. पोलीस दलाला २७६५ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत २८५० वृक्षलागवड करण्यात आली असून उद्दिष्टाच्या अनेक पट रोपे लावली जातील, असा विश्वास ठाकर यांनी व्यक्त केला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विभागीय वाहतूक अधिकारी नागपूर शहर शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या नेतृत्वात वृक्षलागवड केली जात असून अनेक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली आहे.