शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

जि.प. करणार ४ लक्ष ८० हजार वृक्ष लागवड, आजपासून वृक्षदिंडी

By admin | Updated: June 27, 2017 00:46 IST

राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला. मागील वर्षी २ कोटी वृक्षरोपणाचे काम पूर्ण केले, तर यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्षरोपणाचे काम पूर्ण करायचे आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात ४ लक्ष ८० हजार वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. चंद्रपुर जिल्ह्यात वृक्षलागवडीचा शुभारंभ १ जुलै रोजी पोभुर्णा तालुक्यातील घनोटी या गावातून करण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वृक्षरोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गावागावात मंगळवारपासून ‘वृक्षदिंडी २०१७’ चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता होणार आहे. चित्ररथाला जि. प. अध्यक्ष भोंगळे हिरवी झेंडी दाखवतील. वृक्षदिंडीच्या माध्यमातून गावस्तरावर वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. शिवाय पदाधिकारी व अधिकारी यांच्याद्वारा प्रत्येक तालुक्यातील दोन ते तीन गावात जावून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली जाणार आहे. वृक्षरोपणानंतर ते वृक्ष जगविण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. नरेगामधून वृक्षरोपणासाठी खड्डे खोदकामाचे सुरू आहे. पंचायत समिती परिसरात १०० वृक्ष याप्रमाणे १५०० वृक्ष, शिक्षण विभाग ४५ हजार ९३० पशुसंवर्धन विभाग १ हजार ४३५, आरोग्य विभाग २ हजार ५२५, महिला व बालकल्याण विभाग ११ हजार ८९९, समाजकल्याण विभाग १ हजार ३२०, बांधकाम विभाग २ हजार ३० असे एकूण ६६ हजार ६३९ वृक्षारोपणाचे नियोजन विविध विभागाचे असून उर्वरित वृक्ष जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायती अतर्गत लावण्यात येईल. यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात ४ लक्ष ८० हजारवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज असून,यासाठी प्रत्येक तालुक्या करिता जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखांवर एका तालुक्याची संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड यांना नेमण्यात आले आहे, अशी माहितीही जि.प. अध्यक्ष भोंगळे यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अर्थ व बांधकाम सभापती तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, नरेगाचे संजय बोदेले उपस्थित होते.