शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाणीटंचाईवर जिल्हा परिषदेचे हात वर

By admin | Updated: April 28, 2017 00:50 IST

जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू असून लांबवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

सत्ताधारी ढिम्म : परिस्थितीवर मात करण्यासाठी सभाच नाही चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू असून लांबवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेने वेळीच उपायोजना करण्याची गरज होती. मात्र एवढी गंभीर समस्या असतानाही सत्ताधाऱ्यांनी कोणतीही उपायोजना न करता, जिल्हा परिषदेची पाणी टंचाईवर एकही सभा घेतलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी केवळ विकासाचा कांगावा करीत असून जिल्हा परिषद ढिम्म असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते सतीश वारजूकर यांनी केला आहे. पाणी टंचाईवर आढावा बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा म्हणून गटनेता डॉ. सतिश वारजुकर यांनी काँग्रेसचे २१ सदस्य व ४ सभापती यांच्या स्वाक्षरीनिशी जि.प. अध्यक्षांना नोटीस दिली होती. या अगोदरही मागील वर्षीचा आढावा घेण्यासाठी ५ एप्रिलला नोटीस दिली होती. ती सभा २ मे रोजी म्हणजे तब्बल २७ दिवसांनी लावली. पण पाणी पुरवठा योजनेवरील पहिला हप्ता मिळाला की दुसऱ्या हप्त्यासाठी सहा-सहा महिने वाट पहावी लागते. त्यावर काहीही उपाय योजना करीत नाही. जिल्हा परिषदेत फाईली सहा-सहा महिने फिरत असतात. जो सतत पाठपुरावा करीत असतो व पैसे देत असतो अशांचीच फाईल बाहेर काढली जाते, असा आरोप वारजूकर यांनी केला आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे जनावरे मृत्यूमुखी पडत आहे. जिकडे-तिकडे आगीच्या घटना घडत आहेत. पाण्याची सोय नाही. त्यामुळे आगी आटोक्यात येत नाही व घरे जळून खाक होत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. परंतु जि.प.तील पदाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत. अनेक गावात हातपंप बंद पडले आहेत. तर कुठे कंत्राटदाराच्या तर कुठे अधिकाऱ्यांच्या तर कुठे पदाधिकाऱ्यांच्या हेकेकोरपणामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी फ्लोराईड युक्त पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु लोकांचा नाईलाज असल्यामुळे असेही पाणी प्यावे लागत आहे. मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती. परंतु यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. लोकांचा जिवन मरणाचा प्रश्न असतानाही जिल्हा परिषदेचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) हातपंप आणि पाणी पुरवठा योजनाही बंद काही काही गावे अशी आहेत की, त्या गावांमध्ये मोजकेच हातपंप आहेत, परंतु तेही बंद आहेत. ते दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्तीची अपुरी वाहने असल्यामुळे हातपंप दुरुस्ती होवू शकत नाही. अशा गावातील लोकांना पाण्यासाठी फारच त्रास सहन करावा लागत आहे. काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे अर्धवट काम झाले आहे. योजनेचे काम कसे झाले, योग्य झाले की काय, यावर कोणाचेही लक्ष नाही. केवळ कमिशनच्या हव्यासापोटी कामाची पाहणी न करता देयके दिल्या जात आहेत, असा प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे.