शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

प्रभारीच्या खांद्यावर जिल्हा परिषदेचा डोलारा

By admin | Updated: May 14, 2016 00:37 IST

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची २९ एप्रिल रोजी ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.

नवीन सीईओची प्रतीक्षा : तीन पदांचा भार एकाच अधिकाऱ्यावरचंद्रपूर : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची २९ एप्रिल रोजी ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. तेव्हापासून चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कारभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. यामुळे विविध कामांमध्येही अडथळे येत असून नवीन सीईओची प्रतीक्षा लागली आहे. बदली झालेले महेंद्र कल्याणकर हे गतवर्षीच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या अनेक बैठका रात्री उशीरापर्यंत चालायच्या. याबाबत विरोधक व सत्ताधाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. कर्मचाऱ्यांत त्यांचा चांगला दरारा होता. मात्र जेमतेम एक वर्षातच त्यांना पदोन्नती देत ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. बदलीनंतर दोन-तीन दिवसांत ते चंद्रपुरातून भारमुक्त झाले. त्यांची बदली होऊन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्याकडे आहे. या व्यतीरिक्त अशोक सिरसे यांच्याकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचाही भार आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याला तीन पदांचा भार सोसावा लागत असून अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या विरोधी सदस्यांचे म्हणणे आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत सध्या भाजप पक्षाची सत्ता आहे आणि राज्यातही भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे वित्त व वन मंत्री आहेत. तरीही नवीन सीईओंच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. तर आपल्या मर्जीतील मुख्य कार्यकारी अधिकारी असावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची फिल्डींग आहे. त्यामुळे नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला विलंब केला जात असल्याचा आरोप विरोधी सदस्यांचा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)