शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे वादळी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल.

ठळक मुद्देआजपासून समुपदेशन : बदलीनंतरही बीईओंना केले नाही भारमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकल्यानंतर रविवारपासून समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, गतवर्षी शिक्षण विभागातील बीईओची बदली होऊनही शिक्षणाधिकाºयांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच ठिकाणी कार्यरत असून त्यांची सेवाज्येष्ठता चक्क शुन्य दाखविण्यात आली. परिणामी, कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे समुपदेशाऐवजी वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षी बदली झालेल्या शिक्षण विस्तार एक वर्षे पूर्ण होऊनही शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच्याच ठिकाणी कार्यरत आहेत. जि. प. ने २१ जुलै २०२१ रोजी बदली पात्र शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य पदांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता शुन्य दाखविण्यात आली. गतवर्षी बदली झाल्यानंतरही या अधिकाऱ्यांना भारमुक्त केले नाही. परिणामी, ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तिथे नवीन बदलीपात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना संधी दिले जात असेल तर या बदल्यांना काय अर्थ, असा प्रश्न  शिक्षण  विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

बदलीपात्र कर्मचाऱ्यांची उसळणार गर्दीजि. प. च्या सर्वच विभागातील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दुपारी ४. ४५ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत चालेल. नक्षलग्रस्त भागातील कर्मचारी व बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत तसेच सुट घेणारे सर्वच कर्मचारी आवश्यक प्रमाणपत्रांसह दाखल होणार आहेत. त्यामुळे गर्दी उसळणार आहे.

२० टक्के बदल्यांना मान्यता- सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार २० टक्के बदल्यांना मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दोन आदेश धडकल्याने त्यामुळे नेमक्या किती टक्के बदल्या होणार, याबाबत कर्मचारी व संघटनांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. नव्या आदेशामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली