शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे वादळी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल.

ठळक मुद्देआजपासून समुपदेशन : बदलीनंतरही बीईओंना केले नाही भारमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकल्यानंतर रविवारपासून समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, गतवर्षी शिक्षण विभागातील बीईओची बदली होऊनही शिक्षणाधिकाºयांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच ठिकाणी कार्यरत असून त्यांची सेवाज्येष्ठता चक्क शुन्य दाखविण्यात आली. परिणामी, कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे समुपदेशाऐवजी वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षी बदली झालेल्या शिक्षण विस्तार एक वर्षे पूर्ण होऊनही शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच्याच ठिकाणी कार्यरत आहेत. जि. प. ने २१ जुलै २०२१ रोजी बदली पात्र शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य पदांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता शुन्य दाखविण्यात आली. गतवर्षी बदली झाल्यानंतरही या अधिकाऱ्यांना भारमुक्त केले नाही. परिणामी, ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तिथे नवीन बदलीपात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना संधी दिले जात असेल तर या बदल्यांना काय अर्थ, असा प्रश्न  शिक्षण  विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

बदलीपात्र कर्मचाऱ्यांची उसळणार गर्दीजि. प. च्या सर्वच विभागातील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दुपारी ४. ४५ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत चालेल. नक्षलग्रस्त भागातील कर्मचारी व बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत तसेच सुट घेणारे सर्वच कर्मचारी आवश्यक प्रमाणपत्रांसह दाखल होणार आहेत. त्यामुळे गर्दी उसळणार आहे.

२० टक्के बदल्यांना मान्यता- सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार २० टक्के बदल्यांना मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दोन आदेश धडकल्याने त्यामुळे नेमक्या किती टक्के बदल्या होणार, याबाबत कर्मचारी व संघटनांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. नव्या आदेशामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली