शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्चात जिल्हा परिषद माघारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:16 IST

जिल्ह्यातील विविध कल्याणकारी विकास योजनांसाठी जिल्हा परिषदेतील १२ विभागांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २० कोटी ७३ लाख ५४ हजारांचा निधी मिळाला. फेब्रुवारी २०१९ पर्यंत यातील पाच कोटी ८२ लाखांचा निधी खर्च झाला. उपलब्ध निधीतील एकूण खर्चाची टक्के केवळ २८.६२ एवढी अत्यल्प आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात शेकडो विकासकामे ठप्प आहेत. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत म्हणजे अवघ्या १४ दिवसांत उर्वरित १४ कोटी खर्च होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देफेब्रवारीपर्यंत केवळ २८.२२ टक्के खर्च : अखर्चित निधी यंदाही परत जाण्याच्या मार्गावर

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील विविध कल्याणकारी विकास योजनांसाठी जिल्हा परिषदेतील १२ विभागांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २० कोटी ७३ लाख ५४ हजारांचा निधी मिळाला. फेब्रुवारी २०१९ पर्यंत यातील पाच कोटी ८२ लाखांचा निधी खर्च झाला. उपलब्ध निधीतील एकूण खर्चाची टक्के केवळ २८.६२ एवढी अत्यल्प आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात शेकडो विकासकामे ठप्प आहेत. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत म्हणजे अवघ्या १४ दिवसांत उर्वरित १४ कोटी खर्च होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत कृषी पशुसंवर्धन, सिंचन, समाजकल्याण, आरोग्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण (प्राथमिक), बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, स्वच्छता व पाणी व्यवस्थापन आणि पंचायत आदी विभागाकरिता २० कोटी ७३ लाख ५४ हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे.विकास कामांचे नियोजन करून हा निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदने तत्परता दाखविणे अत्यावश्यक असते. मात्र कृषी, समाजकल्याण व जिल्हा ग्रामविकास यंत्रणा या तीन विभागांचा अपवाद वगळल्यास अन्य नऊ विभागांना किमान ३५ टक्के निधी करण्यातही अपशय आले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सर्वाधिक ६२.२४ टक्के निधी खर्च केला तर दुसरा क्रमांक कृषी विभागाचा (५५.४७ टक्के) लागतो. समाज कल्याण विभागाने ५२. ८० टक्के खर्च केला आहे. सर्व विभागांना निधी उपलब्ध असतानाही कल्याणकारी योजनांवर विहित कालमर्यादेत (मार्च अखेरपर्यंत) खर्च का करण्यात आले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता केव्हा लागणार, याचा काही प्रमाणात अंदाज असूनही नियोजनाअभावी यंदाही अखर्चित निधी परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.सिंचनावर केवळ २.५३ टक्के खर्चजिल्हा परिषद सिंचन विभागासाठी १ कोटी ४८ लाख ८४३ रुपयांचा निधी मिळाला. या निधीचा तातडीने उपयोग करून ग्रामीण भागातील सिंचनाची प्रलंबित कामे पूर्ण करणे शक्य झाले असते. मात्र, फेब्रुवारी २०१९ पर्यंत केवळ २.५३ टक्के निधी खर्च झाला. सिंचनाची अनेक कामे रखडल्याचा आरोप सरपंच करीत आहेत.बालकल्याण योजनांची उपेक्षाबालकल्याण हितासाठी जिल्हा परिषदने विविध योजनांची घोषणा केली. योजनांवर खर्च करण्यासाठी बालकल्याण विभागाला चार कोटी नऊ लाखाच्ाां निधी मिळाला. १.६२ टक्के निधी खर्च करुन बाल कल्याण योजनांची उपेक्षा केली आहे.पाणी प्रश्न पेटणारग्रामीण पाणी पुरवठा योजनेकरिता १५ कोटी ३५ लाख ८४ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. यंदा अल्प पाऊस पडल्याने जलस्त्रोतांनी तळ गाठला. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांवर सर्वाधिक निधी खर्च करणे अपेक्षित होते. परंतु जिल्हा परिषदने उपलब्ध निधीतून फक्त २५.९० टक्के निधी खर्च केला. त्यामुळे बंद पडलेल्या शेकडो गावातील नळयोजना, हातपंप व विहिरींचे काय, हा प्रश्न पुढे आला आहे.