शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

जिल्हा परिषदेने व्याज घेऊनही दिली नाही शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:00 IST

मोठा गाजावाजा करून आर्थिकदृष्टया दुर्बल समाज घटकांतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या वेतनातून २३ लाख ५० हजार रूपये जमा केले होते. या रक्कमेवर तब्बल १२ लाख ५० हजार रूपये व्याजही मिळाले.

ठळक मुद्देसावित्रीबाई दत्तक योजना : २३ लाख ५० हजार रुपये अद्याप वितरणाविना

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोठा गाजावाजा करून आर्थिकदृष्टया दुर्बल समाज घटकांतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या वेतनातून २३ लाख ५० हजार रूपये जमा केले होते. या रक्कमेवर तब्बल १२ लाख ५० हजार रूपये व्याजही मिळाले. मात्र, २०१४ पासून या योजनेचे रक्कम अद्याप वितरण केले नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई दत्तक पालक योजना लागू करण्यात आली. याकरिता शिक्षकांच्या वेतनातील विशिष्ट रक्कम जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे २३ लाख ५० हजार रूपये जिल्हा परिषदेमध्ये जमा झाले. या रक्कमेतून पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देणे बंधनकारक होते. परंतु, ढिसाळ नियोजन आणि उदासिन धोरणांमुळे ही रक्कम हजारो विद्यार्थिनींना मिळाली नाही. शिक्षकांनी जमा केलेल्या रकमेवर जिल्हा परिषदेला १२ लाख ५० हजारांचे व्याज मिळाले. ही रक्कम आता ३६ लाखांपर्यंत झाली आहे.शिक्षण समितीच्या सभेत अधिकाऱ्यांविरूद्ध रोषया योजनेचा निधी विद्यार्थिनींना न मिळाल्याने जि. प. शिक्षण समितीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध रोष व्यक्त केला. शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी या योजनेवरून संबंधितांना धाबेवर धरले. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच निधी वितरण करण्याचे निर्देशही दिले. सदस्य पृथ्वीराज अवथडे, रोशनी अनवर खान, नितु चौधरी, गोपाल दडमल, रंजित सोयाम, कल्पना पेचे, तज्ज्ञ सदस्य जे. डी. पोटे आदींनीही विद्यार्थिनींच्या आर्थिक कोंडीकडे लक्ष वेधून रक्कम तातडीने अदा करण्याची सूचना बैठकीत मांडली.दत्तक योजनेच्या निकषात बदल‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ हा निकष लक्षात घेऊन सावित्रीबाई दत्तक पालक योजनेचा विद्यार्थिनींना लाभ देण्याचा निर्णय यापूर्वी जिल्हा परिषदेने घेतला होता. यामध्ये आता बदल करण्यात आले. नव्या निकषानुसार आई- वडील नसणे, आई अथवा वडील नसणे, आई वडील दिव्यांग असणे तसेच आई वडील हयात असताना त्यांचा कुणीच सांभाळ न करणे अशा उपेक्षित विद्यार्थिनींनाही मुख्याध्यापकांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.बैठकीला दांडी मारल्यास वेतन कपातदरमहा होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत संबंधित गट शिक्षणाधिकारी परवानगी न घेता गैरहजर राहतात किंवा प्रतिनिधी पाठवून जबाबदारी झटकतात. शिक्षण विभागातील प्रलंबित समस्यांबाबत तोडगाच निघत नाही. त्यामुळे बैठकीला स्वत: हजर न होणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे एक दिवसांचे वेतन कापण्याचा ठराव शिक्षण समितीने पारीत केला आहे.सेमी इंग्लिशसाठी ४७ शाळांचे प्रस्तावजिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यासाठी आता ४७ शाळांनी प्रस्ताव सादर केले. शिक्षण समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. जिल्ह्यातील आणखी काही प्राथमिक शाळा प्रस्ताव सादर करणार आहेत.