शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

गोवरी येथे पावसासाठी युवकांचे मुंडण

By admin | Updated: June 24, 2016 01:33 IST

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर तब्बल २० दिवसांचा कालवधी उलटून गेला. मात्र जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही.

बा पावसा, आता तरी बरस : शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षागोवरी : पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर तब्बल २० दिवसांचा कालवधी उलटून गेला. मात्र जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. वरुणराजा बरसेल या प्रतीक्षेत सर्वत्र आराधना करण्यात येत आहे. गोवरी येथील ८ युवकांनी वरुणराजाला साकडे घालण्यासाठी चक्क मुंडन केले. परंतु पाऊस येण्याची चिन्ह दिसत नसल्याचे शेतकरी हताश झाले आहेत.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचे शेतकऱ्यांना दगा दिला आहे. उसनवारी व कर्ज काढून घेतलेले महागडे बियाणे अपुऱ्या पावसाने जमिनीतच करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बंडू जुनघरी, चंदन ताजणे, विठ्ठल जुनघरी, मारोती वाढई, समाधान पिंपळशेंडे, कवडू खवसे, संतोष ताजणे, संजय म्हशाखेत्री या आठ युवकांनी पाऊस येण्यासाठी मुंडन केले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा अजुनही होरपळतो आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. निसर्गाशिवाय शेती ही संकल्पनाच करणे अवघड आहे. मात्र निसर्ग आता लहरीपणामुळे वागायला लागल्याने शेती बेभवरश्याची झाली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट असून या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला कोणीही तयार नाही. पावसाला साकडे घालण्यासाठी सर्वच स्तरातून पूजा, पाठ करण्यात येत आहे. मात्र वरुणराजा का रुसला असा प्रश्न सर्वांनाच अनुत्तरीत करणारा आहे. ग्रामीण भागात पाऊस येण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेऊन आराधना करण्यात येत आहे. आकाशात काळे ढग गर्दी करतात. मात्र पाऊस सर्वांनाच हुलकावणी देत निघून जात आहे.आज, उद्या पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहते. दिवसरात्र काबाडकष्ट करुनही शेवटी हाती काहिच लागत नाही. हे आजवरचे एककटू सत्य आजही कायम आहे. पाऊस येण्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका क्षणाक्षणाला चुकत असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. वरूण राजा आता तरी कृपा कर अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून सुरू आहे. (वार्ताहर)