शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोवरी येथे पावसासाठी युवकांचे मुंडण

By admin | Updated: June 24, 2016 01:33 IST

पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर तब्बल २० दिवसांचा कालवधी उलटून गेला. मात्र जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही.

बा पावसा, आता तरी बरस : शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षागोवरी : पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर तब्बल २० दिवसांचा कालवधी उलटून गेला. मात्र जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. वरुणराजा बरसेल या प्रतीक्षेत सर्वत्र आराधना करण्यात येत आहे. गोवरी येथील ८ युवकांनी वरुणराजाला साकडे घालण्यासाठी चक्क मुंडन केले. परंतु पाऊस येण्याची चिन्ह दिसत नसल्याचे शेतकरी हताश झाले आहेत.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचे शेतकऱ्यांना दगा दिला आहे. उसनवारी व कर्ज काढून घेतलेले महागडे बियाणे अपुऱ्या पावसाने जमिनीतच करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बंडू जुनघरी, चंदन ताजणे, विठ्ठल जुनघरी, मारोती वाढई, समाधान पिंपळशेंडे, कवडू खवसे, संतोष ताजणे, संजय म्हशाखेत्री या आठ युवकांनी पाऊस येण्यासाठी मुंडन केले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा अजुनही होरपळतो आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. निसर्गाशिवाय शेती ही संकल्पनाच करणे अवघड आहे. मात्र निसर्ग आता लहरीपणामुळे वागायला लागल्याने शेती बेभवरश्याची झाली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट असून या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला कोणीही तयार नाही. पावसाला साकडे घालण्यासाठी सर्वच स्तरातून पूजा, पाठ करण्यात येत आहे. मात्र वरुणराजा का रुसला असा प्रश्न सर्वांनाच अनुत्तरीत करणारा आहे. ग्रामीण भागात पाऊस येण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेऊन आराधना करण्यात येत आहे. आकाशात काळे ढग गर्दी करतात. मात्र पाऊस सर्वांनाच हुलकावणी देत निघून जात आहे.आज, उद्या पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहते. दिवसरात्र काबाडकष्ट करुनही शेवटी हाती काहिच लागत नाही. हे आजवरचे एककटू सत्य आजही कायम आहे. पाऊस येण्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका क्षणाक्षणाला चुकत असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. वरूण राजा आता तरी कृपा कर अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून सुरू आहे. (वार्ताहर)