शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी युवकांचा एल्गार

By admin | Updated: August 21, 2016 02:54 IST

जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले.

९ सप्टेंबरला धरणे : सोशल मीडियावरही रंगतेयं चर्चाब्रह्मपुरी : जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले. पण युवकांच्या मनात मात्र अजूनही ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी कायम आहे. सोशल मिमियाच्या ३०० ते ३५० युवकांचा समावेश असलेल्या ग्रुपवर जिल्ह्यासाठी अनेक मत नोंदवित युवकांनी ‘ जिंकू किंवा मरु’ असा संकल्पही केल्याने येत्या काही काळात ब्रह्मपुरी जिल्हा मागणीचा लढा तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचीही घोषणा सर्वपक्षीय, युवक, महिला वर्गाकडून करण्यात आली आहे.ब्रह्मपुरी हे शहर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. येथील राजकारणात अनेकवेळा वादविवादही झाले. आता कोण मोठा व कोण लहान याचा विचार मागे पडून जिल्हा निर्मितीच्या लढ्याची धुरा या तरुणवर्गानी आपल्या अंगावर घेतली आहे. अहिंसा मार्ग पत्करुनच ते लढा देणार आहेत. सोशल मिडियावर शहरातील ३०० ते ३५० युवकांनी एकत्र येऊन एक ग्रुप स्थापन केला व त्यामध्ये पुढे जिल्ह्याच्या लढ्याचे विचार मंथन तासनतास किंवा रात्रंदिवस सुरू झाले. त्यामध्ये युवकांनी आपली केवळ मते मांडली नाही तर संघर्षाची तयारीही दर्शविली असल्याने जिल्हानिर्मितीच्या आंदोलनाला आणखी तिव्रता येणार आहे. ब्रह्मपुरीत आजूबाजूचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन अन्य ठिकाणी कार्यरत आहेत. त्या युवकांनीही ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, यासाठीचे आपले समर्थन सोशल मिडियावर दर्शविले आहे.हे केवळ ब्रह्मपुरीच्या वैभवशाली संपत्तीचे फलित आहे. एरवी ब्रह्मपुरीचा युवक अभ्यासाच्या पलिकडे अन्य बाबीकडे लक्ष देत नाही. पण ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी आता येथील तरुण अक्षरश: पेटून उठलेला दिसून येत आहे. जिल्ह्याच्या मागणीसाठी आम्ही वेळप्रसंगी ‘सैराट’ होऊ अशीही शपथ या ग्रुपवर युवकांनी घेतल्याने त्यांच्या अंतर्मनाची कळकळ दिसू लागली आहे. सोशल मिडिया हे केवळ निमित्त आहे. त्यातून लक्षात घेण्यासारखे म्हणजे जिल्हानिर्मितीविषयीची त्यांची कळकळ. त्यांच्या सोशल मिडियाच्या चर्चेतून आंदोलनाचे स्वरुपही ठरत आहे. त्यातूनच ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात युवकांच्या साक्षीने धरणे आंदोलन होणार आहे. परंतु या सर्व घडामोडीत ‘युवक व विवेक’ याचा ताळमेळ नक्कीच राहणार आहे. उठसूट कोणीही पात्रता नसताना जिल्ह्यासाठी आपलाच क्षेत्र पात्र असल्याचा आव आणून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करेत असेल तर ते ब्रह्मपुरीकर खपवून घेणार नाही. तो येथील पोषक मूल्यांचा अपमान ठरेल, असेही मत युवक वर्गाकडून मांडले जात आहे. आता ही मते कृतीत परावर्तीत होत असल्याने ‘जिंकू किंवा मरु’ चा संकल्प आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे. (तालुका प्रतिनिधी)