शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी युवकांचा एल्गार

By admin | Updated: August 21, 2016 02:54 IST

जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले.

९ सप्टेंबरला धरणे : सोशल मीडियावरही रंगतेयं चर्चाब्रह्मपुरी : जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले. पण युवकांच्या मनात मात्र अजूनही ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी कायम आहे. सोशल मिमियाच्या ३०० ते ३५० युवकांचा समावेश असलेल्या ग्रुपवर जिल्ह्यासाठी अनेक मत नोंदवित युवकांनी ‘ जिंकू किंवा मरु’ असा संकल्पही केल्याने येत्या काही काळात ब्रह्मपुरी जिल्हा मागणीचा लढा तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचीही घोषणा सर्वपक्षीय, युवक, महिला वर्गाकडून करण्यात आली आहे.ब्रह्मपुरी हे शहर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. येथील राजकारणात अनेकवेळा वादविवादही झाले. आता कोण मोठा व कोण लहान याचा विचार मागे पडून जिल्हा निर्मितीच्या लढ्याची धुरा या तरुणवर्गानी आपल्या अंगावर घेतली आहे. अहिंसा मार्ग पत्करुनच ते लढा देणार आहेत. सोशल मिडियावर शहरातील ३०० ते ३५० युवकांनी एकत्र येऊन एक ग्रुप स्थापन केला व त्यामध्ये पुढे जिल्ह्याच्या लढ्याचे विचार मंथन तासनतास किंवा रात्रंदिवस सुरू झाले. त्यामध्ये युवकांनी आपली केवळ मते मांडली नाही तर संघर्षाची तयारीही दर्शविली असल्याने जिल्हानिर्मितीच्या आंदोलनाला आणखी तिव्रता येणार आहे. ब्रह्मपुरीत आजूबाजूचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन अन्य ठिकाणी कार्यरत आहेत. त्या युवकांनीही ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, यासाठीचे आपले समर्थन सोशल मिडियावर दर्शविले आहे.हे केवळ ब्रह्मपुरीच्या वैभवशाली संपत्तीचे फलित आहे. एरवी ब्रह्मपुरीचा युवक अभ्यासाच्या पलिकडे अन्य बाबीकडे लक्ष देत नाही. पण ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी आता येथील तरुण अक्षरश: पेटून उठलेला दिसून येत आहे. जिल्ह्याच्या मागणीसाठी आम्ही वेळप्रसंगी ‘सैराट’ होऊ अशीही शपथ या ग्रुपवर युवकांनी घेतल्याने त्यांच्या अंतर्मनाची कळकळ दिसू लागली आहे. सोशल मिडिया हे केवळ निमित्त आहे. त्यातून लक्षात घेण्यासारखे म्हणजे जिल्हानिर्मितीविषयीची त्यांची कळकळ. त्यांच्या सोशल मिडियाच्या चर्चेतून आंदोलनाचे स्वरुपही ठरत आहे. त्यातूनच ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात युवकांच्या साक्षीने धरणे आंदोलन होणार आहे. परंतु या सर्व घडामोडीत ‘युवक व विवेक’ याचा ताळमेळ नक्कीच राहणार आहे. उठसूट कोणीही पात्रता नसताना जिल्ह्यासाठी आपलाच क्षेत्र पात्र असल्याचा आव आणून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करेत असेल तर ते ब्रह्मपुरीकर खपवून घेणार नाही. तो येथील पोषक मूल्यांचा अपमान ठरेल, असेही मत युवक वर्गाकडून मांडले जात आहे. आता ही मते कृतीत परावर्तीत होत असल्याने ‘जिंकू किंवा मरु’ चा संकल्प आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे. (तालुका प्रतिनिधी)