शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी युवकांचा एल्गार

By admin | Updated: August 21, 2016 02:54 IST

जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले.

९ सप्टेंबरला धरणे : सोशल मीडियावरही रंगतेयं चर्चाब्रह्मपुरी : जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले. पण युवकांच्या मनात मात्र अजूनही ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी कायम आहे. सोशल मिमियाच्या ३०० ते ३५० युवकांचा समावेश असलेल्या ग्रुपवर जिल्ह्यासाठी अनेक मत नोंदवित युवकांनी ‘ जिंकू किंवा मरु’ असा संकल्पही केल्याने येत्या काही काळात ब्रह्मपुरी जिल्हा मागणीचा लढा तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचीही घोषणा सर्वपक्षीय, युवक, महिला वर्गाकडून करण्यात आली आहे.ब्रह्मपुरी हे शहर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. येथील राजकारणात अनेकवेळा वादविवादही झाले. आता कोण मोठा व कोण लहान याचा विचार मागे पडून जिल्हा निर्मितीच्या लढ्याची धुरा या तरुणवर्गानी आपल्या अंगावर घेतली आहे. अहिंसा मार्ग पत्करुनच ते लढा देणार आहेत. सोशल मिडियावर शहरातील ३०० ते ३५० युवकांनी एकत्र येऊन एक ग्रुप स्थापन केला व त्यामध्ये पुढे जिल्ह्याच्या लढ्याचे विचार मंथन तासनतास किंवा रात्रंदिवस सुरू झाले. त्यामध्ये युवकांनी आपली केवळ मते मांडली नाही तर संघर्षाची तयारीही दर्शविली असल्याने जिल्हानिर्मितीच्या आंदोलनाला आणखी तिव्रता येणार आहे. ब्रह्मपुरीत आजूबाजूचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन अन्य ठिकाणी कार्यरत आहेत. त्या युवकांनीही ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, यासाठीचे आपले समर्थन सोशल मिडियावर दर्शविले आहे.हे केवळ ब्रह्मपुरीच्या वैभवशाली संपत्तीचे फलित आहे. एरवी ब्रह्मपुरीचा युवक अभ्यासाच्या पलिकडे अन्य बाबीकडे लक्ष देत नाही. पण ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी आता येथील तरुण अक्षरश: पेटून उठलेला दिसून येत आहे. जिल्ह्याच्या मागणीसाठी आम्ही वेळप्रसंगी ‘सैराट’ होऊ अशीही शपथ या ग्रुपवर युवकांनी घेतल्याने त्यांच्या अंतर्मनाची कळकळ दिसू लागली आहे. सोशल मिडिया हे केवळ निमित्त आहे. त्यातून लक्षात घेण्यासारखे म्हणजे जिल्हानिर्मितीविषयीची त्यांची कळकळ. त्यांच्या सोशल मिडियाच्या चर्चेतून आंदोलनाचे स्वरुपही ठरत आहे. त्यातूनच ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात युवकांच्या साक्षीने धरणे आंदोलन होणार आहे. परंतु या सर्व घडामोडीत ‘युवक व विवेक’ याचा ताळमेळ नक्कीच राहणार आहे. उठसूट कोणीही पात्रता नसताना जिल्ह्यासाठी आपलाच क्षेत्र पात्र असल्याचा आव आणून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करेत असेल तर ते ब्रह्मपुरीकर खपवून घेणार नाही. तो येथील पोषक मूल्यांचा अपमान ठरेल, असेही मत युवक वर्गाकडून मांडले जात आहे. आता ही मते कृतीत परावर्तीत होत असल्याने ‘जिंकू किंवा मरु’ चा संकल्प आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे. (तालुका प्रतिनिधी)