शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

तरुणाईने जिंकले रणांगन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

मासळ (बु) : चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींचा निकाल लागला. यात अनेक गावांत युवावर्गाने प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देत गावातील ...

मासळ (बु) : चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींचा निकाल लागला. यात अनेक गावांत युवावर्गाने प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देत गावातील कारभारांची सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. मात्र आता सरपंच पदाचे आरक्षण कसे येईल, या चिंतेत ते सापडले आहेत.

निवडणुकीत विजय तर संपादन केला. मात्र सरपंच पदाचे आरक्षण कोणते, हे चित्र मात्र अजूनही अस्पष्ट असल्याने सरपंच पदाच्या गप्पा आता चौकाचौकांत रंगू लागल्या आहेत. या गप्पांमध्ये आमच्या पक्षाची किती ग्रामपंचायतींत दावेदारी आहे, हे सांगण्याची घाई अनेक गावपुढाऱ्यांना दिसून येत आहे.

सोमवारी निकाल लागल्यानंतर दिवसभर गावागावांत जल्लोष होता. सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाचे निघणार, सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावर आता तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी येत असल्याने सरपंच पद मानाचे व मिळकतीचे बनत आहे. त्यामुळे सरपंच पदाची खुर्ची अनेक नवनियुक्त युवा तरुणांना भुरळ पाडत आहे. मतदारांनी निवडून दिलेल्या उमेदवारांना आरक्षण सोडतीपासून अजून लांबच ठेवले आहे. जेवढी उत्सुकता निवडून येण्याची होती, त्यापेक्षा जास्त आता आरक्षण सोडतीची आहे. ज्या उमेदवाराला गावातील पॅनेलने निवडणुकीत बळजबरीने उभे केले त्यालासुद्धा आता सरपंच पदाचे स्वप्न पडू लागले आहे.

बॉक्स

नेत्यांचे दावे-प्रतिदावे

सोमवारी निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याबरोबर वरिष्ठ नेते गावागावांत जाऊन निवडणुकीत विजय संपादित केलेला नवनियुक्त सदस्य हा आमच्या पक्षाचा, असे सांगत आहेत. तर दुसरा नेता तोच उमेदवार आमचा असल्याचे सांगत आहेत.