शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून युवकांनी उचलला शहर स्वच्छतेचा विडा

By admin | Updated: May 25, 2015 01:37 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण शहरात घनकचरा व सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

वेदांत मेहरकुळे गोंडपिपरीगेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण शहरात घनकचरा व सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व आरोग्यास अपायकारक बाबींकडे येथील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातीलच काही युवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून अखेर शहर स्वच्छतेचा विडा उचलेला आहे. पहाटेच गावात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ व्हायला लागला आहे. महिनाभरापासून हा क्रम अविरत सुरू असून ग्रामपंचायतीने मात्र जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या वतीने ग्रावखेड्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ग्राम विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्चून अनेक कल्याणकारी योजना अमंलात आणल्या आहेत. मात्र जनकल्याणकारी योजनाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी भ्रष्ट व दुर्लक्षित धोरणातून अनेक गावात योजनांचा बट्ट्याबोळ केल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येते. अशातच गोंडपिपरी या तालुकास्तर असलेल्या शहरात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.शहरात अस्वच्छतेच्या साम्राज्याला तोंड देण्यास ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असताना शहरातील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक तेजराव पाटील व अरुण वासलवार यांनी शहरातील युवा मंडळींचा मेळ घालत राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून दैनंदिन स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला.प्रारंभी चार ते पाच युवकांनी हे कार्य सुरू केले. त्यानंतर इतर युवकांनीही अभियानात सहभागी होऊन स्वच्छता मोहिमेस हातभार लावणे सुरू केले. १ एप्रिलपासून ही मोहीम सुरू करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला जात आहे. या मोहिमेत आज २२ हून अधिक युवक सहभागी आहेत. अगदी पहाटेच सदर मंडळी एकत्रित येऊन रोज एक तास स्वच्छता अभियान राबवितात. याच दरम्यान मोहिमेत कुठल्याही महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असल्यास किंवा मोहिमेतील सदस्यांचा जन्मदिवस असल्यास अतिरिक्त श्रमदान केले जाते, हे विशेष.एक दिवस अभियान राबविताना स्वच्छ केलेल्या परिसरात खुद्द ग्रामपंचायत कर्मचारीच नालीतील घाण टाकून पसार झाले. मात्र मोहिमेतील सदस्यांनी पुन्हा ती घाण साफ करुन ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार धोरणाला शांततेने व कामातून प्रत्युत्तर दिले.या युवकांनी केलेले काम आता इतर गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.