शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून युवकांनी उचलला शहर स्वच्छतेचा विडा

By admin | Updated: May 25, 2015 01:37 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण शहरात घनकचरा व सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

वेदांत मेहरकुळे गोंडपिपरीगेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण शहरात घनकचरा व सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व आरोग्यास अपायकारक बाबींकडे येथील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातीलच काही युवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून अखेर शहर स्वच्छतेचा विडा उचलेला आहे. पहाटेच गावात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ व्हायला लागला आहे. महिनाभरापासून हा क्रम अविरत सुरू असून ग्रामपंचायतीने मात्र जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या वतीने ग्रावखेड्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ग्राम विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्चून अनेक कल्याणकारी योजना अमंलात आणल्या आहेत. मात्र जनकल्याणकारी योजनाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी भ्रष्ट व दुर्लक्षित धोरणातून अनेक गावात योजनांचा बट्ट्याबोळ केल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येते. अशातच गोंडपिपरी या तालुकास्तर असलेल्या शहरात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.शहरात अस्वच्छतेच्या साम्राज्याला तोंड देण्यास ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असताना शहरातील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक तेजराव पाटील व अरुण वासलवार यांनी शहरातील युवा मंडळींचा मेळ घालत राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून दैनंदिन स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला.प्रारंभी चार ते पाच युवकांनी हे कार्य सुरू केले. त्यानंतर इतर युवकांनीही अभियानात सहभागी होऊन स्वच्छता मोहिमेस हातभार लावणे सुरू केले. १ एप्रिलपासून ही मोहीम सुरू करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला जात आहे. या मोहिमेत आज २२ हून अधिक युवक सहभागी आहेत. अगदी पहाटेच सदर मंडळी एकत्रित येऊन रोज एक तास स्वच्छता अभियान राबवितात. याच दरम्यान मोहिमेत कुठल्याही महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असल्यास किंवा मोहिमेतील सदस्यांचा जन्मदिवस असल्यास अतिरिक्त श्रमदान केले जाते, हे विशेष.एक दिवस अभियान राबविताना स्वच्छ केलेल्या परिसरात खुद्द ग्रामपंचायत कर्मचारीच नालीतील घाण टाकून पसार झाले. मात्र मोहिमेतील सदस्यांनी पुन्हा ती घाण साफ करुन ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार धोरणाला शांततेने व कामातून प्रत्युत्तर दिले.या युवकांनी केलेले काम आता इतर गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.