शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून युवकांनी उचलला शहर स्वच्छतेचा विडा

By admin | Updated: May 25, 2015 01:37 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण शहरात घनकचरा व सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

वेदांत मेहरकुळे गोंडपिपरीगेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण शहरात घनकचरा व सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व आरोग्यास अपायकारक बाबींकडे येथील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातीलच काही युवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून अखेर शहर स्वच्छतेचा विडा उचलेला आहे. पहाटेच गावात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ व्हायला लागला आहे. महिनाभरापासून हा क्रम अविरत सुरू असून ग्रामपंचायतीने मात्र जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या वतीने ग्रावखेड्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ग्राम विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्चून अनेक कल्याणकारी योजना अमंलात आणल्या आहेत. मात्र जनकल्याणकारी योजनाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी भ्रष्ट व दुर्लक्षित धोरणातून अनेक गावात योजनांचा बट्ट्याबोळ केल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येते. अशातच गोंडपिपरी या तालुकास्तर असलेल्या शहरात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.शहरात अस्वच्छतेच्या साम्राज्याला तोंड देण्यास ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असताना शहरातील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक तेजराव पाटील व अरुण वासलवार यांनी शहरातील युवा मंडळींचा मेळ घालत राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून दैनंदिन स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला.प्रारंभी चार ते पाच युवकांनी हे कार्य सुरू केले. त्यानंतर इतर युवकांनीही अभियानात सहभागी होऊन स्वच्छता मोहिमेस हातभार लावणे सुरू केले. १ एप्रिलपासून ही मोहीम सुरू करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला जात आहे. या मोहिमेत आज २२ हून अधिक युवक सहभागी आहेत. अगदी पहाटेच सदर मंडळी एकत्रित येऊन रोज एक तास स्वच्छता अभियान राबवितात. याच दरम्यान मोहिमेत कुठल्याही महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असल्यास किंवा मोहिमेतील सदस्यांचा जन्मदिवस असल्यास अतिरिक्त श्रमदान केले जाते, हे विशेष.एक दिवस अभियान राबविताना स्वच्छ केलेल्या परिसरात खुद्द ग्रामपंचायत कर्मचारीच नालीतील घाण टाकून पसार झाले. मात्र मोहिमेतील सदस्यांनी पुन्हा ती घाण साफ करुन ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार धोरणाला शांततेने व कामातून प्रत्युत्तर दिले.या युवकांनी केलेले काम आता इतर गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.