शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

युवा शेतकऱ्याची कर्जापायी आत्महत्या

By admin | Updated: March 2, 2017 00:35 IST

येथील युवा शेतकरी नितीन देवराव घाटे (३० वर्षे) याने २८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

नंदोरी : येथील युवा शेतकरी नितीन देवराव घाटे (३० वर्षे) याने २८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्यावर असलेले बँकेचे आणि खाजगी कर्ज हे आत्महत्येमागील कारण सांगितले जात आहे.नितीन घाटे याच्या नावाने चार एकर शेती असून त्याच्यावर बॅँक आॅफ इंडिया नागरी शाखेचे ६५ हजार रूपयांचे कर्ज होते. या सोबतच दोन लाख रूपयांचे खाजगी कर्जही त्याच्यावर होते. या कर्जासाठी त्याने आपली शेती तारण ठेवली होती. काही दिवसांपूर्वी शेतीसाठी त्याने टॅ्रक्टर खरेदी केले होते. मात्र त्या कर्जाचे हप्ते न भरू शकल्याने टॅ्रक्टरची जप्ती झाली होती. हे कर्ज त्याच्यावर थकित होते. यामुळे तो नेहमी विवंचनेत असायचा. २८ फेब्रुवारीच्या रात्री शांतता झाल्यावर त्याने आपल्या राहत्या घराच्या मोकळ्या जागेत जावून नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याच्या वडीलांना जाग आल्यावर तो बिछान्यावर दिसला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू केल्यावर काही वेळानंतर हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. सकाळी वरोरा पोलिसांनी घटनास्थळी येवून प्रेत ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविले. दुपारी त्याच्या पार्थिवावर नंदोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे वडील, एक बहिण, पत्नी असा आप्तपरिवार आहे. (वार्ताहर)वाढदिवसाच्या दिवशीचकेली आत्महत्या२८ फेब्रुवारी या दिवशी नितीनचा वाढदिवस होता. मात्र परिस्थितीमुळे त्याला आपला वाढदिवस साजरा करता आला नाही. नेमका हाच दिवस त्याने आपली जीवनयात्रा संपविण्यासाठी निवडला. हा योगायोग की नियतीचा खेळ असा प्रश्न या घटनेने पडला आहे.