शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी पीडितांनी व्यक्त केल्या आपल्या व्यथा

By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST

भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष

चंद्रपूर : भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, प्रमुख पाहुणे सहकार शिक्षणाधिकारी नरेंद्र पिंपळकर, संस्थेचे कायदे विषयक सल्लागार अ‍ॅड. संदीप नागपुरे, डॉ. राहुल विधाते, शीतल साळवे आदी उपस्थित होते. पत्नी पीडितांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी विचाराचे आदानप्रदान झाले. कायदेविषयक मार्गदर्शन अ‍ॅड. संदीप नागपुरे यांनी केले. चंद्रपूर येथे कौटुंबिक न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर व्हावे जेणेकरुन आरोपी फिर्यादीचा वेळ व पैशाची बचत होऊन न्याय त्वरित मिळेल, अशी आशा डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी व्यक्त केली.महिलांच्या हाती ४९८(अ) चा कायदा आहे. मर्जीप्रमाणे पती नाचला तर, ठिक नाहीतर ४९८ (अ) चा कायद्यानुसार सासरचे सर्वकुटुंब गजाआड करता येते. घरात पत्नी आहे की, दहशतवादी आहे. हेच कळत नसल्याच्या भावना काहींनी यावेळी व्यक्त केल्या. या कायद्याच्या गैरवापरामुळे संंपूर्ण कुटुंब दहशतीत वावरते, नातेवाईक व समाज विरोधात असते. महिला तक्रार मंचात खटला दाखल करताना पती दारु पितो, मारहाण करतो, शारीरिक व लैंगिक त्रास देतो, खर्चाला पैसे देत नाही, घरी उशीरा येतो, परस्त्रीशी संबंध आहे. अशी तक्रार करते. परंतु येथे समझौता न झाल्यास तीच स्त्री माहेरची मंडळी, संधिसाधू सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पती मला हुंड्यासाठी त्रास देतो असे खोटे सांगतात. हुंडाबळीची केस करते. आणि पूर्ण परिवाराला हुंडाबळीच्या नरकयातना भोगाव्या लागतात. यात घरातील वृद्ध, महिला, लहान मुल, गर्भवती स्त्रीया अडकल्या जाते.पत्नी पतीला आपल्या मर्जीत ठेवतात. पतीचा एटीएमसारखा वापर करीत आहे. सासू व सासऱ्याला हमाल बनविले आहे. या प्रकरणात माहेरील लोकांचा हात असतो, ज्या घरात माहेरील लोकांची ढवळाढवळ जास्त असते ते घर उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नसल्याचाही सूर यावेळी काहींनी व्यक्त केला. मोबाईलची महत्त्वाची भूमिका असते. लग्नाला सौद्याचे रुप येत आहे. आज लग्न व चार दिवसांनी पैशाची मागणी करुन घटस्फोट, विवाह पैसा कमविण्याचे साधन होत आहे. समाजाला कीड पोखरुण काढीत आहे. भविष्यात कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यताही यावेळी काहींनी व्यक्त केली.पोलीस प्रशासनाने कौटुंबिक प्रकरणात आतताईपणा करुन कारवाई करु नये. सामाजिक जाण ठेवावी, आईवडिलांची आपले पणाची भावना वाढीस लागावी, कुटुंबाची संकल्पना टीकून राहावी, पाल्यांना संपूर्ण घराचा अनुभव जगता यावा, कौटुंबिक कलहाचे निकाल लवलकर लागावे या उद्देशाने कौटुंबिक न्यायालयाची गरज असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. सभेला संदीप आत्राम, शंकर लोनगाडगे, किशोर ताजणे, आशिक शेख व इतर संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)