शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पत्नी पीडितांनी व्यक्त केल्या आपल्या व्यथा

By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST

भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष

चंद्रपूर : भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, प्रमुख पाहुणे सहकार शिक्षणाधिकारी नरेंद्र पिंपळकर, संस्थेचे कायदे विषयक सल्लागार अ‍ॅड. संदीप नागपुरे, डॉ. राहुल विधाते, शीतल साळवे आदी उपस्थित होते. पत्नी पीडितांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी विचाराचे आदानप्रदान झाले. कायदेविषयक मार्गदर्शन अ‍ॅड. संदीप नागपुरे यांनी केले. चंद्रपूर येथे कौटुंबिक न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर व्हावे जेणेकरुन आरोपी फिर्यादीचा वेळ व पैशाची बचत होऊन न्याय त्वरित मिळेल, अशी आशा डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी व्यक्त केली.महिलांच्या हाती ४९८(अ) चा कायदा आहे. मर्जीप्रमाणे पती नाचला तर, ठिक नाहीतर ४९८ (अ) चा कायद्यानुसार सासरचे सर्वकुटुंब गजाआड करता येते. घरात पत्नी आहे की, दहशतवादी आहे. हेच कळत नसल्याच्या भावना काहींनी यावेळी व्यक्त केल्या. या कायद्याच्या गैरवापरामुळे संंपूर्ण कुटुंब दहशतीत वावरते, नातेवाईक व समाज विरोधात असते. महिला तक्रार मंचात खटला दाखल करताना पती दारु पितो, मारहाण करतो, शारीरिक व लैंगिक त्रास देतो, खर्चाला पैसे देत नाही, घरी उशीरा येतो, परस्त्रीशी संबंध आहे. अशी तक्रार करते. परंतु येथे समझौता न झाल्यास तीच स्त्री माहेरची मंडळी, संधिसाधू सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पती मला हुंड्यासाठी त्रास देतो असे खोटे सांगतात. हुंडाबळीची केस करते. आणि पूर्ण परिवाराला हुंडाबळीच्या नरकयातना भोगाव्या लागतात. यात घरातील वृद्ध, महिला, लहान मुल, गर्भवती स्त्रीया अडकल्या जाते.पत्नी पतीला आपल्या मर्जीत ठेवतात. पतीचा एटीएमसारखा वापर करीत आहे. सासू व सासऱ्याला हमाल बनविले आहे. या प्रकरणात माहेरील लोकांचा हात असतो, ज्या घरात माहेरील लोकांची ढवळाढवळ जास्त असते ते घर उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नसल्याचाही सूर यावेळी काहींनी व्यक्त केला. मोबाईलची महत्त्वाची भूमिका असते. लग्नाला सौद्याचे रुप येत आहे. आज लग्न व चार दिवसांनी पैशाची मागणी करुन घटस्फोट, विवाह पैसा कमविण्याचे साधन होत आहे. समाजाला कीड पोखरुण काढीत आहे. भविष्यात कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यताही यावेळी काहींनी व्यक्त केली.पोलीस प्रशासनाने कौटुंबिक प्रकरणात आतताईपणा करुन कारवाई करु नये. सामाजिक जाण ठेवावी, आईवडिलांची आपले पणाची भावना वाढीस लागावी, कुटुंबाची संकल्पना टीकून राहावी, पाल्यांना संपूर्ण घराचा अनुभव जगता यावा, कौटुंबिक कलहाचे निकाल लवलकर लागावे या उद्देशाने कौटुंबिक न्यायालयाची गरज असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. सभेला संदीप आत्राम, शंकर लोनगाडगे, किशोर ताजणे, आशिक शेख व इतर संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)