शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

अंत्यसंस्कार तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. पण तो अकाली नको. त्यामुळे अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे कार्य म्हणून कुणीही ...

चंद्रपूर : मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. पण तो अकाली नको. त्यामुळे अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे कार्य म्हणून कुणीही मदतीला धावून जातात. मग ते शहर असो की गाव ! मात्र, कोरोना महामारीने ही माणुसकी आटली. काळजाशी नाते असलेले जीवाभावाचे दुरावले. कोरोना संसर्गाने दगावलेल्या एका व्यक्तीचा अंत्यसंस्कार करायचा आहे, अशी माहिती कुटुंबाला दिल्यानंतर ‘तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही’ असे उत्तर ऐकून आम्ही सुन्न झालो... सांगत होते मृतांवर अंत्यसंस्कार करणारे चंद्रपूर मनपाचे देवदूत कामगार...

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. दोन आठवड्यापासून तर दररोज दहापेक्षा अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे. मंगळवारपर्यंत ५१६ जणांचा मृत्यू झाला तर बाधितांची संख्या ३५ हजार ५१३ वर पोहोचली आहे. मृतांवर अंत्यसंस्कार कसा करावा, अंत्यसंस्काराची जबाबदारी कुणाची, कुटुंबांना माहिती कशी द्यायची, आपल्या स्नेहीजनाचे अखेरचे दर्शन कसे घ्यावे, दुरून धार्मिक विधी करायची परवानगी आहे काय, किती व्यक्ती उपस्थित राहू शकतात, यासारख्या अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकारने गतवर्षीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. चंद्रपूर शहरातील कोविड रुग्णालयात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महानगर पालिकेच्या विशेष पथकाकडे आहे. या पथकाला आरोग्यसुविधा पुरविण्यासोबतच प्रशिक्षणही देण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली जाते. हा साराच प्रकार प्रचंड वेदना देणारा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी कोरोनाने दगावलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाला अंत्यसंस्काराची माहिती दिल्यानंतर ‘तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही’ असे उत्तर ऐकून अंत्यसंस्कार पथकातील सारेच देवदूत अवाक झाले. कोणाच्याही आयुष्याची अशी दुर्दैवी अखेर होऊ नये, हीच भावना त्यांचे पाणावलेले डोळे सांगत होते.

अंत्यसंस्कारासाठी दहा जणांचे पथक सज्ज

चंद्रपुरात कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढली. मृत्यूंनी साऱ्यांनाच हादरा बसला. कोरोना केव्हा संपेल हे सांगता येत नाही. मात्र, दररोजच्या मृतांच्या संख्येमुळे नागरिकांना सावध राहावेच लागणार आहे, अशी सूचना कामगार करतात. यापूर्वी अंत्यसंस्कार पथकात १० कामगार होते. आता पुन्हा १० जणांची नियुक्ती झाली. दोन रुग्णवाहिका व एक शवदाहिनीही सज्ज आहे.

जागेचा प्रश्न नाही, धार्मिक विधीला परवानगी

चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेटबाहेरील आरवट मार्गावर अंत्यसंस्काराची जागा उपलब्ध झाली. या ठिकाणी रात्री १२ वाजतापर्यंतही अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रेत जळायला चार तास लागतात. तोपर्यंत एक सुरक्षा कर्मचारी तिथे तैनात असतो. जागेचाही प्रश्न नाही.

धार्मिक विधीला परवानगी

पीपीई किट घालून कुटुंंबातील व्यक्तीच्या हाताने भडाग्नी देणे अथवा दुरून धार्मिक विधी करण्यास परवानगी आहे. परंतु, प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करावे लागते, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.

मृताचे कुटुंब येईपर्यंत प्रतीक्षा

शवागरात ठेवलेल्या मृतांची नावे आरोग्य कर्मचारी वाचून दाखवितात. मृताचे कुटुंबीय आले तर मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला जातो. कुटुंबातील कुणीच उपस्थित नसतील तर काही तास प्रतीक्षा केली जाते. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाते.