शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

अंत्यसंस्कार तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. पण तो अकाली नको. त्यामुळे अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे कार्य म्हणून कुणीही ...

चंद्रपूर : मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. पण तो अकाली नको. त्यामुळे अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे कार्य म्हणून कुणीही मदतीला धावून जातात. मग ते शहर असो की गाव ! मात्र, कोरोना महामारीने ही माणुसकी आटली. काळजाशी नाते असलेले जीवाभावाचे दुरावले. कोरोना संसर्गाने दगावलेल्या एका व्यक्तीचा अंत्यसंस्कार करायचा आहे, अशी माहिती कुटुंबाला दिल्यानंतर ‘तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही’ असे उत्तर ऐकून आम्ही सुन्न झालो... सांगत होते मृतांवर अंत्यसंस्कार करणारे चंद्रपूर मनपाचे देवदूत कामगार...

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. दोन आठवड्यापासून तर दररोज दहापेक्षा अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे. मंगळवारपर्यंत ५१६ जणांचा मृत्यू झाला तर बाधितांची संख्या ३५ हजार ५१३ वर पोहोचली आहे. मृतांवर अंत्यसंस्कार कसा करावा, अंत्यसंस्काराची जबाबदारी कुणाची, कुटुंबांना माहिती कशी द्यायची, आपल्या स्नेहीजनाचे अखेरचे दर्शन कसे घ्यावे, दुरून धार्मिक विधी करायची परवानगी आहे काय, किती व्यक्ती उपस्थित राहू शकतात, यासारख्या अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकारने गतवर्षीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. चंद्रपूर शहरातील कोविड रुग्णालयात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महानगर पालिकेच्या विशेष पथकाकडे आहे. या पथकाला आरोग्यसुविधा पुरविण्यासोबतच प्रशिक्षणही देण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली जाते. हा साराच प्रकार प्रचंड वेदना देणारा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी कोरोनाने दगावलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाला अंत्यसंस्काराची माहिती दिल्यानंतर ‘तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही’ असे उत्तर ऐकून अंत्यसंस्कार पथकातील सारेच देवदूत अवाक झाले. कोणाच्याही आयुष्याची अशी दुर्दैवी अखेर होऊ नये, हीच भावना त्यांचे पाणावलेले डोळे सांगत होते.

अंत्यसंस्कारासाठी दहा जणांचे पथक सज्ज

चंद्रपुरात कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढली. मृत्यूंनी साऱ्यांनाच हादरा बसला. कोरोना केव्हा संपेल हे सांगता येत नाही. मात्र, दररोजच्या मृतांच्या संख्येमुळे नागरिकांना सावध राहावेच लागणार आहे, अशी सूचना कामगार करतात. यापूर्वी अंत्यसंस्कार पथकात १० कामगार होते. आता पुन्हा १० जणांची नियुक्ती झाली. दोन रुग्णवाहिका व एक शवदाहिनीही सज्ज आहे.

जागेचा प्रश्न नाही, धार्मिक विधीला परवानगी

चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेटबाहेरील आरवट मार्गावर अंत्यसंस्काराची जागा उपलब्ध झाली. या ठिकाणी रात्री १२ वाजतापर्यंतही अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रेत जळायला चार तास लागतात. तोपर्यंत एक सुरक्षा कर्मचारी तिथे तैनात असतो. जागेचाही प्रश्न नाही.

धार्मिक विधीला परवानगी

पीपीई किट घालून कुटुंंबातील व्यक्तीच्या हाताने भडाग्नी देणे अथवा दुरून धार्मिक विधी करण्यास परवानगी आहे. परंतु, प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करावे लागते, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.

मृताचे कुटुंब येईपर्यंत प्रतीक्षा

शवागरात ठेवलेल्या मृतांची नावे आरोग्य कर्मचारी वाचून दाखवितात. मृताचे कुटुंबीय आले तर मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला जातो. कुटुंबातील कुणीच उपस्थित नसतील तर काही तास प्रतीक्षा केली जाते. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाते.