शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वाघ आहात, ध्येयासाठी पेटून उठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:01 IST

चंद्रपूर ही वाघांची भूमी आहे. येथील वाघांनी माझे आयुष्य मी स्वत: बदलेल अशी धारणा ठेऊन स्वत:च्या आयुष्याची ब्ल्यु प्रिट तयार करावी, स्वत:वर विश्वास ठेऊन ध्येय गाठण्यासाठी पेटून उठा, असा यशाचा मुलमंत्रच कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नागरे पाटील यांनी चंद्रपूरातील तरुणाईला दिला. आपली बलशक्ती, कमतरता, फायदे व धोके ओळखा, स्वत:बद्दल विश्वास बाळगा आणि ध्येय निश्चित करा, यश तुमच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देविश्वास नागरे पाटील : युवकांनो, बलशक्ती, कमतरता, फायदे व धोके ओळखा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर ही वाघांची भूमी आहे. येथील वाघांनी माझे आयुष्य मी स्वत: बदलेल अशी धारणा ठेऊन स्वत:च्या आयुष्याची ब्ल्यु प्रिट तयार करावी, स्वत:वर विश्वास ठेऊन ध्येय गाठण्यासाठी पेटून उठा, असा यशाचा मुलमंत्रच कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नागरे पाटील यांनी चंद्रपूरातील तरुणाईला दिला. आपली बलशक्ती, कमतरता, फायदे व धोके ओळखा, स्वत:बद्दल विश्वास बाळगा आणि ध्येय निश्चित करा, यश तुमच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.मिशन सेवा अंतर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथ स्पर्धा महोत्सव कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी त्यांनी चंद्रपुरातील युवकांशी हृदय संवाद साधला. कार्यक्रमाचे उद्घाटन वित्त नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना श्यामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, रुलर रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे, सीजीएसटी मुंबईचे सहाय्यक आयुक्त राहुल गावंडे, लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन ईटनकर, अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपवनसंरक्षक गजेंद्र अहिरे, बांबू संशोधन परीक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते.दहशतवादी हल्ल्याचे संकेत मिळताच, मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांची एक ते दीड महिना पाहणी करीत काय, कुठे व कसे करायचे याबाबतचे नियोजन केले. त्याद्वारे ताज हॉटेल परिसरातील हातठेलेवाल्यांना मनपा प्रशासनाच्या सहाकार्याने इतरत्र हलविले. २६ नोव्हेंबरच्या दिवशी हॉटेलमध्ये तीन अतिरेक्यांकडून अंधाधुंद गोळीबार सुरु असताना योग्य नियोजन करीत हॉटेलच्या मागील दरवाज्यातून प्रवेश करुन अतिरेकी हल्ला परतवून लावला. या सर्व बाबी नियोजनातून शक्य होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजन करुन अभ्यास करावा.कष्टाला शॉर्टकट नसते-पाटीलअभ्यासासाठी किंवा मार्गदर्शनासाठी दिल्ली, पुणे येथे जाऊन महागडे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. ई-लर्निग, इंटरनेट, ई-बुकच्या माध्यमातून अभ्यास करा. कष्टाला कुठलेही शॉर्टकट नाही, असे प्रतिपादन कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी केले.नागरे म्हणाले, आपणाला काय वाचायचे आहे. यापेक्षा काय वाचू नये, याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी समूह चर्चेद्वारा अभ्यास करा, शांंततेच्या कामात घाम गाळल्यास नंतरचे काम सोपे होते. पहाटेच्या सुमारास शांतता राहत असल्याने त्यावेळचा अभ्यास सरळ मेंदूत जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी अभ्यास करण्याचे नियोजन करा, यशाची उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल टाकणे गरजचे असते. आपले जीवन हे परिपूर्ण आहे. प्रत्येक वेळचे आयुष्य वेगळे असते. जन्म कोणत्या कुळात घेतला, हे आपल्या हातात नसले तरी पुरुषार्थ घडविणे आपल्या हातात आहे. जिद्द, प्रबळ इच्छाशक्तीने प्रयत्न करा, त्यासाठी नियोजन व प्लॉन करणे गरजेचे आहे. आपला शत्रू, धोका, कमतरता आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा, असेहीे त्यांनी सांगितले.नेटवर फालतू वेळ घालवू नकासद्यस्थितीत युवक इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. मात्र युवकांनी नेटचा वापर जपून करावा, नेटवर उपलब्ध साहित्यांचा वापर करुन अभ्यास करावा, नेटवर फालतू वेळ घालवू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार, योगा व व्यायाम करावे, असे आवाहनही विश्वास नागरे पाटील यांनी केले.युवा मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करा, मी ताकदीनिशी तुमच्या पाठीशी - मुनगंटीवारचंद्रपूर ही भूमी एकलव्याची आहे. या ठिकाणी फक्त मार्गदर्शन करणाऱ्या द्रोणाचार्यांची गरज आहे. त्यासाठी विश्वास नागरे पाटील यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहे. त्यांच्या वाणीतून, विचारातून युवकांनी प्रेरित होऊन स्पर्धा परीक्षेचा गड जिंकावा. एकलव्याच्या भूमीतून अर्जुनाचे विक्रम मोडीत निघतील. यशासाठी पूर्ण ताकतीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या असेल, त्यासाठी आपण राज्याचा वित्तमंत्री म्हणून पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे राहणार, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.जेव्हा ब्रिटीश सरकारला भारत छोडोचा इशारा देण्यात आला, त्या आंदोलनात लक्षणीय सहभाग देणारा चंद्रपूर जिल्हाच होता. १९४२ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने क्रांतीज्योत प्रज्वलित करणारा चंद्रपूर जिल्हाच होता. मिशन शौर्यच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टवर चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा फडकविला. आता स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल ठरणाºया विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय राहावे, यादृष्टीने मिशन सेवा यशस्वी करा, असे आवाहनही राज्याचे अर्थ व नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ही पराक्रमाची भूमी आहे. या ठिकाणी पराक्रमाचा इतिहास आहे. जिल्ह्यातून अनेक गुणवान तयार झाले आहेत. ही संख्या वाढविण्याचे आपले ध्येय आहे, असेही ते म्हणाले. निवडक सहा क्रीडाप्रकारांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आॅलिम्पिक पदक मिळवण्यासाठी सिद्ध करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान हेदेखील यासाठी चंद्रपूरमध्ये येणार असल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.