शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

तळोधी (बा.) परिसरातील धान उत्पादकांचे उत्पन्न घटले

By admin | Updated: December 9, 2015 01:27 IST

सुरुवातीपासून धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनच अनेक संकटावर मात करुन मायेच्या ममतेने धानाचे पीक घेणाऱ्या धान उत्पादकाच्या नशिबी शेवटी कर्जच शिल्लक राहिले.

शेतकरी चिंतातुर : काही शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाहीतळोधी (बा.) : सुरुवातीपासून धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनच अनेक संकटावर मात करुन मायेच्या ममतेने धानाचे पीक घेणाऱ्या धान उत्पादकाच्या नशिबी शेवटी कर्जच शिल्लक राहिले. त्यामुळे सदर कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत तळोधी (नागपूर) परिसरातील शेतकरी सापडला आहे.सुरुवातीला पावसाने मारलेली दडी व त्यामुळे पऱ्ह्यांची नासाडी, दुबार पऱ्हे टाकून, कसेबसे धानाची रोवणी केली. मायेच्या ममतेने रोवणी केलेल्या धान पिकाला निसर्गाची साथ नसतानाही महत्प्रयासाने पिकाची जपणूक केली व आता हातात धानाचे पिक येणार, या आनंदात शेतकरीी असताना हंगाम संपण्याच्या शेवटच्या पंधरा दिवसात वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम झाला. एकदम धान पीक कापणीला आले. त्यामुळे धान भरलेच नाही व शेवटी धानाची मळनी करताना धानाचे फोल हवेबरोबर उडून गेले. त्यामुळे धान उत्पादकाच्या उत्पादनात कमीतकमी ३० ते ४० टक्के घट झाली आहे. सुरुवातीला धानाची दुबार पेरणी, अपुऱ्या पावसामुळे पाणी देण्याचा वाढलेला खर्च व भोगावा लागलेला त्रास, उत्पादनात झालेली ३० ते ४० टक्के घट व शासनाकडून धान पिकाला मिळणारा अत्यल्प भाव, यामुळे तळोधी (बा.) परिसरातील शेतकरी सर्व बाजूने नागवला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादनाच्या शेतीकरिता काढलेले कर्ज व त्यावरील व्याज कसे परत करावे. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. (वार्ताहर)