शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

होय ! जिल्ह्यासाठी नागभीड हेच योग्य स्थान आहे

By admin | Updated: January 14, 2016 01:46 IST

जिल्हा निर्मितीच्या चर्चांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून आमचेच गाव जिल्ह्यासाठी कसे योग्य आहे. हे पटवून देण्याचा खटाटोपही केला जात आहे.

सर्वेक्षण करुनच शासनाने निर्णय घ्यावा : रेल्वे व राज्य मार्गाची उपलब्धीघनश्याम नवघडे नागभीडजिल्हा निर्मितीच्या चर्चांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून आमचेच गाव जिल्ह्यासाठी कसे योग्य आहे. हे पटवून देण्याचा खटाटोपही केला जात आहे. पण भौगोलिकदृष्टया विचार करता चिमूर आणि ब्रह्मपुरीपेक्षा नागभीड हेच शहर जिल्ह्यासाठी सर्वार्थाने योग्य आहे हे कोणीही नाकारता येणार नाही.चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन एक नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी फार जुनी मागणी आहे. ही मागणी प्रशासकीयदृष्टया योग्यसुद्धा आहे. कारण ब्रह्मपुरी नागभीडपासून मुख्यालय असलेल्या चंद्रपूरचे अंतर १२५ ते १०० कि.मी.च्या घरात आहे. चिमूरचेही असेच आहे. त्यामुळे एखाद्या शासकीय कामासाठी गेलेला एखादा व्यक्ती त्याच दिवशी काम पूर्ण करुन परत आला, असे कधी होत नाही. याच आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून नवीन जिल्ह्याची मागणी अनेकदा होत असते.नविन जिल्ह्याची मागणी होत असताना ब्रह्मपुरीकर आणि चिमूरकर आपले घोडे नेहमीच पुढे दामटत असतात. त्यांचे शहर म्हणून त्यांच्यासाठी त्यांची ही मागणी योग्यही आहे. ब्रह्मपुरी व्यापारी नगरी आहे. विद्येचे व वैद्यकीय सेवेचे माहेरघर आहे. तर चिमूर क्रांतीभूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूरचे भरीव योगदान आहे. पण या गोष्टींची उपलब्धी असली म्हणून त्या जिल्हा निर्मितीसाठी समर्थनीय ठरु शकत नाही. जिल्ह्यासाठी त्या शहराचे भौगोलिक स्थळ, दळणवळणाच्या सोयी आणि कार्यालयासाठी जागेची उपलब्धता या महत्त्वाच्या बाबी आवश्यक असतात. आणि त्या नागभीडमध्ये आहेत. आणि म्हणूनच जिल्ह्यासाठी नागभीड हेच योग्य आहे. असा दावा केल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.तालुक्याच्याच दृष्टीने विचार केल्यास नागभीड हे ब्रह्मपुरी, चिमूर आणि सिंदेवाही या तिन्ही तालुक्यांना अतिशय मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून ब्रह्मपुरी २० कि.मी., चिमूर ३५ किमी आणि सिंदेवाही ४० किमीवर आहे. उलट ब्रह्मपुरी हे शहर चिमूर आणि सिंदेवाहीस अतिशय गैरसोयीचे आहे. तर चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाहीस गैरसोयीचे आहे. नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथे जाण्यासाठी राज्यमहामार्ग असून या पाचही जिल्ह्याचे अंतर जवळपास १०० कि.मीच्या घरात आहे. कार्यालयीन जागेचीसुद्धा येथे वानवा नाही. येथील पंचायत समिती परिसर, गोसीखुर्द कार्यालय परिसर यासाठी योग्य आहे.नागभीड जिल्ह्याची मागणी होत असताना, ही मागणी नवीन आहे, त्यामुळे शासन या मागणीचा कसा विचार करेल असाही युक्तीवाद केला जातो. पण या युक्तीवादात मुळीच तत्थ्य नाही. गडचिरोली जिल्हा जेव्हा निर्माण करण्यात आला, त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याची मागणी कुठे पुढे आली होती ? गडचिरोलीचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन एका रात्रीतूनच गडचिरोली जिल्हा निर्माण करण्यात आला होता. नागभीड जिल्ह्याची मागणी भलेही ब्रह्मपुरी, चिमूरच्या समकालीन नसेल. पण गेल्या काही वर्षांपासून मागणी होत आहे. हे तेवढेच खरे आहे आणि भौगोलिकदृष्टया स्थानही योग्य आहे. सर्वच तालुक्यांना सोयीचेही आहे. शासनास जर खरोखरच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करावयाची असेल तर आपल्या यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण करुन जिल्ह्याची निर्मिती करावी, केवळ मागणी करतात म्हणून जिल्हा निर्मिती होऊ नये.