शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनामुळे यंदा रब्बी हंगाम लागवड क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:48 IST

तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. यंदा सुमारे १७७.९ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी झाली असून भाजीपाला, फुलझाडे, टरबूज व इतर पिकेही शेतकरी घेताना दिसत आहेत.

ठळक मुद्देमूल तालुक्यात १७७ हेक्टर भातशेती : शेतकरी घेत आहेत भाजीपाल्याची पिके

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. यंदा सुमारे १७७.९ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी झाली असून भाजीपाला, फुलझाडे, टरबूज व इतर पिकेही शेतकरी घेताना दिसत आहेत.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी मुबलक निधी देत आहेत. यातुनच चिरोली येथे २ कोटींचा बंधारा बांधण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५ मोठे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याकामांमुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे. यासोबतच लघु पाटबंधारे विभागाकडून बंधारे व तलावाच्या गेटचे काम सुरू आहेत. मागील तीन वर्षांपासून तालुका कृषी विभागाने शेततलाव, बोळी, नाला खोलीकरण, गाळ उपसा, बंधारे व जलशिवार योजनेच्या माध्यमातून सिंचनाची विविध कामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात अनेक पिके घेत आहेत. तालुक्यात भातशेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. वाघोली बुटी उपसा योजना, हरणघाट उपसा सिंचन व बोरघाट योजनेचे पाणी खरीप हंगामात शेतीकरिता उपलब्ध करून दिल्या जाते. पण, अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चिचडोह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. सदर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी पाणी मिळणार आहे.नहराची दुरूस्ती अत्यावश्यकमागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी वाघोली बुटी उपसा सिंचन योजना, हरणघाट उपसा सिंचन प्रकल्प उपयुक्त ठरले. परंतु हे प्रकल्प जुने असल्यामुळे अनेक नहराला भेगा पडल्या आहेत. मुख्य कालवा नादुरूस्त असल्याने शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती