शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

वर्षभरापूर्वीच मनपाला रामाळातील प्रदूषणाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST

ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊन नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देप्रदुषण मंडाळाने पाण्याचे नमूने घेण्यापूर्वीच प्रदूषणाची कळविली दाहकता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धन तसेच प्रदूषणाबाबत इको-प्रोने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आता  सामाजिक संघटनांसह सामान्य नागरिकही जुळत आहे. दरम्यान, रामाळा तलावातील प्रदूषणाची पातळी मोठी असून, ते पाणी पिण्यायोग्य नसून, जलचल प्राण्यांनाही धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच म्हणजे, १४ फेब्रुवारी २०२० लाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून अवगत केले होते. मात्र महापालिका प्रशासनाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले आहे.येथील ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊन नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्याच्या पृथ्थकरण अहवालातून बीओडीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. घरगुती सांडपाण्यामुळे ते प्रमाण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली होती. तसेच एसएस, टीडीएस, आर्यन, शिशे आदीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही नमूद केले होते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मनपाने वर्षभर काहीच का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नमुने घेण्यापूर्वीच मनपाला पत्रमहाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला रामाळा तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. यापूर्वीच म्हणजे १४ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनाला  पत्र पाठवून पाणी प्रदूषित असल्याचे कळविले होते. हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने २५  फेब्रुवारी २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होत आहे. प्रदूषण मंडळाने तत्परता दाखविली असतानाही महापालिका प्रशासनाने रामाळा तलावातील प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण