शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

साहित्यिकांच्या लेखण्या विवेकनिष्ठ व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:18 IST

आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : आंबेडकरवादी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळद्वारा पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमूर येथील शेतकरी भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्घ साहित्यिक व विचारवंत प्रा.दीपककुमार खोब्रागडे होते. उदघाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसीध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, संघरामगीरीचे संघनायक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, अ‍ॅड. भुपेश पाटील, सुरेश डांगे, डॉ.धनराज खानोरकर, साहित्यिक ना.गो.थुटे, आत्माराम ढोक, विद्याधर बन्सोड, प्रा. वामन शेळमाके, किशोर गजभीये, शुध्दोधन कांबळे, महेश मोरे उपस्थत होते.क्रांतीभूमीत दोन दिवस चालनाऱ्या साहित्य संमेलनादरम्यान इंदिरा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रसंत साहित्यनगरीपर्यत प्रथम संविधान गौरवरॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकारून नागरिकांचे लक्ष वेधले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करून क्रांतीभूमीतील पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ या काव्यसंग्रहाचे, डॉ. भुपेश पाटील यांच्या ‘जेव्हा गाव पेटून उठतो तेव्हा’, भानुदास पोपटे यांच्या ‘राष्ट्रीय अभंगवाणी’ या काव्यसंग्रहाचे व विद्याधर बन्सोड, अनंता सूर आदींचे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.संमेलन परिसरात पुस्तकाचे स्टॉलदोन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नागरी परिसरात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून अनेकजण येथून हजारोंची पुस्तके खरेदी करीत असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.