शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

साहित्यिकांच्या लेखण्या विवेकनिष्ठ व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:18 IST

आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : आंबेडकरवादी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळद्वारा पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमूर येथील शेतकरी भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्घ साहित्यिक व विचारवंत प्रा.दीपककुमार खोब्रागडे होते. उदघाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसीध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, संघरामगीरीचे संघनायक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, अ‍ॅड. भुपेश पाटील, सुरेश डांगे, डॉ.धनराज खानोरकर, साहित्यिक ना.गो.थुटे, आत्माराम ढोक, विद्याधर बन्सोड, प्रा. वामन शेळमाके, किशोर गजभीये, शुध्दोधन कांबळे, महेश मोरे उपस्थत होते.क्रांतीभूमीत दोन दिवस चालनाऱ्या साहित्य संमेलनादरम्यान इंदिरा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रसंत साहित्यनगरीपर्यत प्रथम संविधान गौरवरॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकारून नागरिकांचे लक्ष वेधले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करून क्रांतीभूमीतील पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ या काव्यसंग्रहाचे, डॉ. भुपेश पाटील यांच्या ‘जेव्हा गाव पेटून उठतो तेव्हा’, भानुदास पोपटे यांच्या ‘राष्ट्रीय अभंगवाणी’ या काव्यसंग्रहाचे व विद्याधर बन्सोड, अनंता सूर आदींचे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.संमेलन परिसरात पुस्तकाचे स्टॉलदोन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नागरी परिसरात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून अनेकजण येथून हजारोंची पुस्तके खरेदी करीत असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.