शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

डाटाबेसमधील त्रुट्यामुळे शिक्षकांची तारांबळ

By admin | Updated: August 6, 2015 02:01 IST

राज्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची संख्या एका क्लिकवर तालुका ते राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांना पाहता यावी व शिक्षण विभागाकडून शाळांना ...

अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला : संगणकाबाबत शिक्षकही अज्ञानीआशिष देरकर गडचांदूरराज्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची संख्या एका क्लिकवर तालुका ते राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांना पाहता यावी व शिक्षण विभागाकडून शाळांना वारंवार मागण्यात येणाऱ्या कागदपत्रांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने सरलच्या माध्यमातून डाटाबेस प्रणाली विकसित करण्यात आली. मात्र वेबसाईटमध्ये अनेक दोष असल्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. ी४िूं३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर २ूँङ्मङ्म’ या विकल्पात माहिती भरताना जास्तीत जास्त वेळा वेबसाईट व्यस्तच असते. काही मोठ्या शाळांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे दाखल खारीज वेगवेगळे असतात. अशावेळी प्राथमिक आणि उच्च माध्यमिकचा दाखल खारीज क्रमांक सारखा येत असल्यामुळे सदर क्रमांक पूर्वीच वापरात आला असल्याचा संदेश स्क्रीनवर येतो. त्यामुळे शिक्षकांनी अशावेळी करावे काय, असा प्रश्न पडतो. अनेक मुख्याध्यापकांनासुद्धा याबाबत कल्पना नसल्यामुळे शिक्षकांना समस्या सोडविताना अडचण निर्माण होत आहे.शासनाने पूर्वी विद्यार्थ्याची एकूण वेगवेगळी ८० माहिती असणारा फार्म भरण्यास सांगितले होते. मात्र दिलेल्या वेळेत ते शक्य नसल्यामुळे त्याचे तीन टप्प पाडण्यात आले. पहिल्या टप्प्यात आता फक्त १५ माहितीचा फार्म भरण्याच्या सूचना सर्व शाळांना प्राप्त झाल्या आहेत. असे असले तरी शिक्षकांसमोर अजूनही अनेक अडचणी आहे. शासनाने वेबसाईटवर वयाच्या बाबतीतसुद्धा मर्यादा घातल्या आहे. अनेक विद्यार्थी उशिरा दहावी पास झाले. त्यामुळे त्यांनी शिकायचे नाही का, असाही शिक्षकांचा प्रश्न आहे. कारण १९९५ च्या अगोदरची जन्मतारीख असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येत नसल्याचे दिसते. शासनाने वेबसाईटवरील दोष दूरुस्त केल्यास शिक्षकांना माहिती भरणे सोपे जाईल. कारण गेल्या वर्षीसुद्धा आॅनलाईन संच निर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाचा तो प्रयोग अयशस्वी ठरला होता. शासनाचा नवीन प्रयोग अतिशय चांगला असला तरी त्यातील त्रुट्या दूर होणे आवश्यक आहे.शाळांना संगणक व इंटरनेट आवश्यकआरटीईनुसार कितीही दुर्गम भागातील शाळा असली तरी व्यवस्था नसतानाही काही शाळांनी संगणक व इंटरनेट असल्याची माहिती शासनाला दिली आहे. त्यामुळे कोणतीही शाळा आमच्याकडे संगणक व इंटरनेटची सुविधा नाही, अशा प्रकारची तक्रार आता करु शकणार नसल्याचे समजते. त्यामुळे जिवतीसारख्या दुर्गम भागातील शिक्षकांची गैरसोय होत आहे. माहिती शाळेतच भरण्याचे आदेशशाळेची माहिती गोपनीय व महत्वाची असल्यामुळे इतर ठिकाणी जाऊन माहिती भरण्यास मनाई आहे. कारण मुख्याध्यापक व शिक्षकांना युजरनेस व पासवर्ड देण्यात आला आहे. तो इतरांना माहीत झाल्यास गैरवापर होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या शाळांकडे पर्याय नाही, त्यांनी तर शाळाबाह्य व्यक्तीला माहिती भरण्याचे टेंडरच दिले आहे.बोगस विद्यार्थ्यांवर आळा घालण्यासाठी आधारअनेक शाळांमध्ये आजही बोगस विद्यार्थी दिसून येतात. आश्रमशाळांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. डाटाबेस प्रणालीमुळे बोगस विद्यार्थी संख्येवर आळा बसणार असून विद्यार्थी प्रवेश क्रमांक व आधार क्रमांक जोडला जाणार आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाचे अनुदान घेणाऱ्या संस्थाचालकांचे मनोबल खचले आहे. शिक्षकही अशिक्षित !प्रत्येक वर्ग शिक्षकांना स्वत: संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून माहिती भरायची असल्यामुळे ज्या शिक्षकांनी कधी संगणकाला हात लावला नाही, अशाही शिक्षकांवर ‘माऊस’ पकडण्याची वेळ आली आहे. शिकवित आलेल्या विषयात पारंगत असलेले अनेक शिक्षक संगणकाच्या बाबतीत मात्र अशिक्षित आढळत आहे.