शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

हृदयाच्या तळमळीतूनच लेखन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:15 IST

साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे.

ठळक मुद्देअशोक पवार : राजुरा येथे तेजस्विनी साहित्य पुरस्कार, कवी संमेलन

आॅनलाईन लोकमतगोवरी : साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे. समाजात जगताना दाहक आणि आल्हाददायक अनुभव येत असतात. मात्र, सामाजिक वास्तव साहित्यातून मांडत असताना हृदयाची तळमळ असावी लागते, असे मत प्रसिद्ध कादंबरीकार अशोक पवार यांनी व्यक्त कले. राजूरा येथील स्वामी विवेकानंद सभागृहात तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार वितरण व कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा अल्लूरवार यांनी उद्घाटन केले. स्वागताध्यक्ष उमाकांत धांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण बाळ योजनाचे अध्यक्ष सतीश धोटे, जि. प. सदस्य सुनील उरकुडे, नत्थू बोबडे, किशोर कवठे उपस्थित होते. अशोक पवार यांनी साहित्याच्या विविध प्रवाहांवर भाष्य केले. अष्टपैलू व्यक्तिमत्व साहित्यिक पुरस्कार डॉ. बळवंत भोयर, रामचंद्र धोटे स्मृती कादंबरी पुरस्कार आचार्य विजया मारोतकर, वाघुजी गावंडे स्मृती कथासंग्रह पूरस्कार डॉ. बाबुराव उपाध्ये, वामनराव गड्डमवार स्मृती समीक्षा पुरस्कार बाळू दुगदुमवार, शांताबाई बोबडे स्मृती काव्य पुरस्कार डॉ. माधव जाधव, हनुमंत चिल्लावार स्मृती आत्मकथन पुरस्कार डॉ. जयप्रकाश घुमटकर, तर कल्याण तेजस्विनी साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रीती वडनेरकर, डॉ. राजकुमार मुसने, अविनाश पोईनकर, प्रा. चित्रा देशमुख, नरेशकूमार बोरीकर आदींना प्रदान करण्यात आला. परिक्षक डॉ. अनंता सूर म्हणाले, साहित्यातून समाजातील वास्तव मांडावे. वास्तवदर्शी साहित्य अमर होईल. साहित्य हे समाजमन चेतविण्याचे काम करते. खºया साहित्यातून समाजाला दिशा मिळते, असे मत व्यक्त केले. संचालन वर्षा कोल्हे-जवळे व प्रास्ताविक संगीता धोटे यांनी केले. प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात पंढरपूर येथील कवयित्री स्वाती भोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यावेळी कवींनी बहारदार कविता सादर केल्या. संचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले. कार्यक्रमाला कवी, साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते.