शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांचे तत्त्वज्ञान जगाला मान्य करावे लागणार

By admin | Updated: October 18, 2015 01:07 IST

आजचा आशिया खंड जंबोद्वीप म्हणून ओळखला जात होता. अडीच हजार वर्षांपूर्वी या भूमीत तथागत बुद्धांचा धम्म अस्तित्वात होता.

अथुरलिये रतन थेरोंना विश्वास : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या मुख्य समारंभात मांडले विचारचंद्रपूर : आजचा आशिया खंड जंबोद्वीप म्हणून ओळखला जात होता. अडीच हजार वर्षांपूर्वी या भूमीत तथागत बुद्धांचा धम्म अस्तित्वात होता. चारही दिशा धम्म तत्वज्ञानाने प्रवाहित झाल्या होत्या. मैत्री व करुणा नांदत होती. मात्र परकीय आक्रमणांनी धम्माला ग्लानी आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माला नवी ऊर्जा दिली. बुद्धांचे तत्वज्ञान शांतता व मैत्री भावना जोपासणारे असल्याने जगाला आगामी २० वर्षात ते मान्य करावे लागेल, असा दृढ विश्वास जागतिक किर्तीचे धम्म प्रचारक, श्रीलंका सरकारचे सल्लागार तथा खासदार भन्ते अथुरलिये रतन थेरो यांनी चंद्रपुरात शुक्रवारी व्यक्त केला.चंद्रपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या माध्यमातून ५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा धम्मभूमीवर आयोजित करण्यात आला. शुक्रवारी मुख्य समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलकांचे खासदार भन्ते अथुरलिये रतन थेरो बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण घोटेकर होते.याप्रसंगी विचार मंचावर भन्ते बोधीसारा थेरो (श्रीलंका), भन्ते विनय बोधीप्रिय थेरो, भन्ते बोधीरत्न, भन्ते सदानंद थेरो, भन्ते प्रज्जारत्न, धम्मचारी पद्मबोधी, चंद्रबोधी पाटील, डॉ. सिद्धार्थ डोंगरे, अशोक घोटेकर, प्राचार्य राजेश दहेगावकर आदींची उपस्थिती होती.अथुरलिये रतन थेरो यावेळी पुढे म्हणाले, ज्या प्रमाणे आई व मुलाचे नाते असते, त्याप्रमाणे धम्माची शिकवण आहे. इतराप्रति करुणा, मैत्री, जिव्हाळा बाळगा, माणसाचे कल्याण आपुलकीच्या भावनेतून साधण्याची गरज आहे. हीच भावना राष्ट्राप्रति असावी, मानवाप्रति असावी. एवढेच नाही तर पर्यावरणाविषयीही ही भावना बाळगण्याची प्रेरणा तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानात सांगितली असल्याचे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:चा विचार केला असता तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते, असेही ते म्हणाले. त्यांनी पाली भाषेतील गाथा व भाषण सिंहली भाषेतून केले. त्यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद भन्ते धम्मज्योती यांनी केला.सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यासाठी आपण प्रशिक्षण देत असून तथागताचा धम्म आरशासारखा असून प्रचलित व्यवस्थेने नाकारलेल्यांना समानता प्रदान करणारा आहे, असे ते म्हणाले.यावेळी सदानंद कोये म्हणाले की, जगातील १०० विद्वानापैकी पहिल्या क्रमांकावर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध असून चवथ्यास्थानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. जगाच्या पाठीवर भारतातील विद्वान असल्याने गौरव वाढला आहे. धम्म सागरात एकजीव होताना मतभेदाला थारा न देता संवादातून धम्म चळवळ गतीेमान करण्याची आज अतिशय गरज आहे, असे त्यांनी सांगितले.धम्मचारी पद्मबोधी, अशोक घोटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. मनोज सोनटक्के तर आभार शैलेंद्र शेंडे यांनी मानले. सद्धम्माची गौरव गाथा कार्यक्रमाच्या माध्यमातून गायक कलावंत हेमंत शेंंडे यांनी बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम सादर करुन वातावरणात मंगलमय साद घातली. (शहर प्रतिनिधी)