शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

दूषित पाण्याची समस्या सोडविणार जागतिक बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 00:44 IST

जिल्ह्यात अनेक गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजाराची लागण होत असून...

चमूची गावांना भेटी : गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चाचंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजाराची लागण होत असून पाण्याचे दुसरे स्त्रोत उपलब्ध नसल्याने दूषित पाण्यानेच गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. याची दखल घेत जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने अ‍ॅरो प्लॅन्टची निर्मीती होणार आहे. यामुळे गावकऱ्यांची फ्लोराईडयुक्त पाण्यापासून मुक्तता होणार आहे.जागतिक बँकेचे सल्लागार मणी व चारु जैन हे जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्याकरिता व करण्यात येणाऱ्या कामांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या भेटीवर आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील खरबी, सिंदेवाही- आलेसूर व चंद्रपूर तालुक्यातील डोणी या गावांना भेटी देवून येथील कामांची पाहणी केली. यावेळी या चमुने जलस्वराज-२ कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या पाणी गुणवत्ता बाधीत व टंचाईग्रस्त गावांनाही भेटी दिल्या. गावकऱ्यांसोबत चर्चा करून गावामधील योजना लोकसहभागावरच चालवाव्या, असे म्हणाले. या व्यतिरिक्त तेथील परिस्थितीवर तसेच उपाययोजनांवर गावकऱ्यांसोबत तसेच उपस्थित अधिकारी वर्गासोबत चर्चा केली. या भेटीदरम्यान जागतिक बँकेच्या चमूने खरबी व आलेसुर येथील शाळेतील मुलांच्या दातांची तपासणी केली असता, त्यांना दातांच्या फ्लोरोसीनचे रुग्ण आढळून आले. तसेच वयोवृद्धांमध्ये हातापायांवर फ्लोराईडयुक्त पाण्याच दुष्परिणाम आढळून आले. त्यामुळे सदर निवडलेली गावे योग्य आहे, अशी खात्री करून घेतली.गावामध्ये पाणी गुणवत्ता बाधीत स्त्रोत असल्याकारणाने तलावामध्ये विहिर घेऊन ते पाणी शुद्ध करून ग्रामस्थांना एटीएमद्वारे पाच रुपयांमध्ये १० लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सुचविले. गावकऱ्यांनी याबाबत संमती दर्शविली. त्यानंतर सिंदेवाही मधील आलेसूर या गावामध्ये सुद्धा सर्व पाण्याचे स्त्रोत दूषित आढळून आले. चंद्रपूर तालुक्यातील डोणी येथे पाणी टंचाई असल्यामुळे त्या ठिकाणी टाकी घेऊन घरोघरी नळ देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याना सुचना देण्यात आले. जागतिक बँकेच्या चमूने गावकऱ्यांसोबत पाणी गुणवत्तेबाबत चर्चा केली. सर्व गावांची पूर्ण पाहणी करून जलस्वराज-२ कार्यक्रमांमधील सर्व योजना या लोकसहभागावरच आधारीत असून त्या ग्रामस्थांनी आपल्या घरची योजना आहे म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी भेटीदरम्यान भुवैज्ञानिक देशकर, कार्यकारी अभियंता मिलींद चंद्रागडे, वरिष्ठ भुवैज्ञानिक विश्वास वालदे, गट विकास अधिकारी प्रदीप बिरमवार, उपकार्यकारी अभियंता पिपरे उपअभियंता शामकुवर, रोहण बालमवार, समाज व्यवस्थापन तज्ञ माधवी मते, माहिती शिक्षण व संवादतज्ञ प्रविण खंडारे, पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले, भुवैज्ञानिक लांजेवार, पंचायत समिती सदस्य अभय हांडेकर, नेवारे, आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)आलेसूर गाव होणार फ्लोराईडयुक्त नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील आलेसूर येथे फ्लोराईडयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलस्वराज्य योजनेंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने जल शुद्धीकरणाची १७ लाख रुपयाची योजना कार्यान्वीत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आलेसूर ग्रामपंचायतीच्या चार विहिरी व पाच हातपंप असून ६०० च्या आसपास गावाची लोकसंख्या आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी व हातपंपावर गावकऱ्यांना अवलंबून राहावे लागत असून इतर पाण्याचे स्त्रोत गावात नाहीत. त्यामुळे मागील वर्षी गावामध्ये तापाची व इतर रोगाची साथ पसरली होती. यावर्षी सुद्धा साथीचे आजार पसरले होते. (वार्ताहर)