शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित होणार कामे

By admin | Updated: April 7, 2015 01:05 IST

ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून

 ग्रामविकास विभागाचा निर्णय : विकास कामांना लागणार टाचचंद्रपूर : ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून गावकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिले जातात. मात्र यावर आता टाच येणार आहे. राज्य शासनाने नुकतेच परिपत्रक काढून ग्रामपंचायतीचे जेवढे उत्पन्न तेवढेच काम हे धोरण अवलंबिले आहे. ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विकास कामे करताना, उत्पन्नाची मर्यादा नव्हती. मात्रा आता एजन्सी म्हणून विकास कामे करताना ग्रामपंचायतींना उत्पन्नाच्या आधारे मर्यादा येणार आहे. खासदार, आमदारांचा स्थानिक विकास निधीतून शासनाच्या इतर योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना आता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. परंतु, ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीतून व्यापक प्रमाणावर विकास कामे होऊ शकत नाहीत. अशातच कामांची गुणवत्ता राखण्यातही अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना आता जेवढे उत्पन्न त्याच आधारावर ग्रामपंचायत स्तरावरची कामे करावी लागणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न ५० हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत तर ज्यांचे उत्पन्न ५० हजारपेक्षा जास्त आहे, त्यांना १५ लाखांपर्यंत विकास कामे करता येणार आहे.यापूर्वी ग्रामपंचायतींना कामे करण्याबाबत जे अधिकार होते, त्यावर या नवीन निर्णयाद्वारे बंधने आली आहेत. त्यामुळे या नव्या निर्णयातून पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न फार कमी आहे, अशा ग्रामपंचायतीनी विकास कामे कशी करावीत, हा पेचही निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रामपंचायतीची कामेकेंद्रीय वित्त आयोग निधीतील कामेशासकीय योजनेतील समाविष्ट कामे.मनरेगाची ५० टक्के किमान कामे.स्वनिधीतील विविध प्रकारचे कामे. या आहेत अटीग्रामपंचायतींना गावठाणच्या हद्दीतील मूलभूत सुविधेची कामे, विकासाची कामे करता येणार आहेत. शाळा इमारत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशी जनहिताची कामे हद्दीच्या बाहेर असतील तरीही करता येणार आहे.