शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित होणार कामे

By admin | Updated: April 7, 2015 01:05 IST

ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून

 ग्रामविकास विभागाचा निर्णय : विकास कामांना लागणार टाचचंद्रपूर : ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून गावकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिले जातात. मात्र यावर आता टाच येणार आहे. राज्य शासनाने नुकतेच परिपत्रक काढून ग्रामपंचायतीचे जेवढे उत्पन्न तेवढेच काम हे धोरण अवलंबिले आहे. ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विकास कामे करताना, उत्पन्नाची मर्यादा नव्हती. मात्रा आता एजन्सी म्हणून विकास कामे करताना ग्रामपंचायतींना उत्पन्नाच्या आधारे मर्यादा येणार आहे. खासदार, आमदारांचा स्थानिक विकास निधीतून शासनाच्या इतर योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना आता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. परंतु, ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीतून व्यापक प्रमाणावर विकास कामे होऊ शकत नाहीत. अशातच कामांची गुणवत्ता राखण्यातही अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना आता जेवढे उत्पन्न त्याच आधारावर ग्रामपंचायत स्तरावरची कामे करावी लागणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न ५० हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत तर ज्यांचे उत्पन्न ५० हजारपेक्षा जास्त आहे, त्यांना १५ लाखांपर्यंत विकास कामे करता येणार आहे.यापूर्वी ग्रामपंचायतींना कामे करण्याबाबत जे अधिकार होते, त्यावर या नवीन निर्णयाद्वारे बंधने आली आहेत. त्यामुळे या नव्या निर्णयातून पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न फार कमी आहे, अशा ग्रामपंचायतीनी विकास कामे कशी करावीत, हा पेचही निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रामपंचायतीची कामेकेंद्रीय वित्त आयोग निधीतील कामेशासकीय योजनेतील समाविष्ट कामे.मनरेगाची ५० टक्के किमान कामे.स्वनिधीतील विविध प्रकारचे कामे. या आहेत अटीग्रामपंचायतींना गावठाणच्या हद्दीतील मूलभूत सुविधेची कामे, विकासाची कामे करता येणार आहेत. शाळा इमारत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशी जनहिताची कामे हद्दीच्या बाहेर असतील तरीही करता येणार आहे.