शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित होणार कामे

By admin | Updated: April 7, 2015 01:05 IST

ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून

 ग्रामविकास विभागाचा निर्णय : विकास कामांना लागणार टाचचंद्रपूर : ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून गावकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिले जातात. मात्र यावर आता टाच येणार आहे. राज्य शासनाने नुकतेच परिपत्रक काढून ग्रामपंचायतीचे जेवढे उत्पन्न तेवढेच काम हे धोरण अवलंबिले आहे. ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विकास कामे करताना, उत्पन्नाची मर्यादा नव्हती. मात्रा आता एजन्सी म्हणून विकास कामे करताना ग्रामपंचायतींना उत्पन्नाच्या आधारे मर्यादा येणार आहे. खासदार, आमदारांचा स्थानिक विकास निधीतून शासनाच्या इतर योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना आता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. परंतु, ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीतून व्यापक प्रमाणावर विकास कामे होऊ शकत नाहीत. अशातच कामांची गुणवत्ता राखण्यातही अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना आता जेवढे उत्पन्न त्याच आधारावर ग्रामपंचायत स्तरावरची कामे करावी लागणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न ५० हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत तर ज्यांचे उत्पन्न ५० हजारपेक्षा जास्त आहे, त्यांना १५ लाखांपर्यंत विकास कामे करता येणार आहे.यापूर्वी ग्रामपंचायतींना कामे करण्याबाबत जे अधिकार होते, त्यावर या नवीन निर्णयाद्वारे बंधने आली आहेत. त्यामुळे या नव्या निर्णयातून पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न फार कमी आहे, अशा ग्रामपंचायतीनी विकास कामे कशी करावीत, हा पेचही निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रामपंचायतीची कामेकेंद्रीय वित्त आयोग निधीतील कामेशासकीय योजनेतील समाविष्ट कामे.मनरेगाची ५० टक्के किमान कामे.स्वनिधीतील विविध प्रकारचे कामे. या आहेत अटीग्रामपंचायतींना गावठाणच्या हद्दीतील मूलभूत सुविधेची कामे, विकासाची कामे करता येणार आहेत. शाळा इमारत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशी जनहिताची कामे हद्दीच्या बाहेर असतील तरीही करता येणार आहे.