शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

श्रमिक एल्गारच्या विरोधात पत्रकारांची धडक

By admin | Updated: August 26, 2015 00:44 IST

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील पत्रकारांनी काढलेल्या मोर्चाने इतिहास घडविला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा : जिल्हाभरातील पत्रकार उतरले रस्त्यावरचंद्रपूर : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील पत्रकारांनी काढलेल्या मोर्चाने इतिहास घडविला. लोकमतचे सावली येथील तालुका प्रतिनिधी उदय गडकरी आणि लोकमतच्या संपादकांविरूद्ध श्रमिक एल्गार संघटनेच्या नेत्या अ‍ॅड. पोरोमिता गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहा पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या निषेधार्र्थ मंगळवारला जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला. श्रमिक एल्गारने सहा ठिकाणी दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यात याव्या, पत्रकारांना कायद्याचे संरक्षण देण्यात यावे व पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणावा, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांच्या विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघ (रजि.), चंद्रपूर इलेक्ट्रॉनिक मीडिया आदी पत्रकार संघटनांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. गिरणार चौकातून निघालेल्या मूक मोर्चात चिमूर, वरोरा, भद्रावती, घुग्घुस, माजरी, राजुरा, जिवती, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, सावली, गडचांदूर, मूल, गोंडपिंपरी, बल्लारपूर, सिंदेवाही, कोरपना, नागभीड येथील शेकडो पत्रकारांनी सहभाग नोंदविला. यात प्रामुख्याने चिमूर तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र पत्रकार संघ वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, यासह सर्व तालुका पत्रकार संघाचा प्रामुख्याने समावेश होता. १२ वाजता गिरणार चौक येथून निघालेला मूक मोर्चा दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. पत्रकारांच्या शिष्ठमंडळाने प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात जावून २० कलमी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन दिले आणि चर्चा केली. शिष्टमंडळामध्ये विविध पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. गोस्वामींवरच गुन्हा दाखल का करु नये?उदय गडकरी यांनी लिहिलेल्या वृत्त विश्लेषणात एखाद्याची बदनामी व्हावी, असे काहीच नाही. तरी देखील सहा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. पत्रकारितेत प्रशंसा करणारे लिखाण होत असताना बरेचदा एखाद्याच्या चुका निदर्शनास आणून देण्यासाठी टीकात्मक लिखाण करावे लागते आणि त्यालाही आधार असतो. असेच लिखाण गडकरींनी केले. परंतु, पोलिसात तक्रार दाखल करुन यासंदर्भातील प्रतिक्रिया अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी नोंदविली. आमच्या लेखी या तक्रारी खोट्या स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे खोटी तक्रार दाखल केली म्हणून श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्यावरच का गुन्हा दाखल करण्यात येवू नसे, असाही एक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.