शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

चंद्रपूर जिल्ह्यातील जॉबकार्ड असलेले मजूर ‘जॉबलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 14:47 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे अडीचहजार जॉबकार्डधारक शेतमजुरांच्या हाताला काम नाही. रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याचे मार्गही बंद झाले.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळातील स्थिती भात शेतीची कामे संपली, जॉबकार्डधारक रोजगाराविना हताश

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान उत्पादनाचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण व आदिवासी भागातील मजुरांना अन्य रोजगार शोधला तरच आर्थिक कोंडीवर काही प्रमाणात मात करता येते. मात्र, लॉकडाऊनमुळे यंदाच्या हंगामी रोजगारावर टाच आली. जिल्ह्यातील सुमारे अडीचहजार जॉबकार्डधारक शेतमजुरांच्या हाताला काम नाही. रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याचे मार्गही बंद झाले. त्यामुळे मनरेगा कामावर पोटाची खळगी भरणाऱ्या मजुरांसमोर ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.केवळ शेतीवर निर्भर असणाºया ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला.यानुसार मनरेगा योजनेसोबत विविध योजनांचा समावेश करून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी मनरेगाची कामे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत मजुरांच्या संख्येनुसार मनरेगा कामाचे उद्दिष्ट देण्यात आले.सर्वच तालुक्यांनी विविध विभागांच्या योजनांना सामील करून मनरेगा योजनेशी करण्याचे धोरण तयार केले. आर्थिक वर्षात १५ आॅगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कृती आराखडा तयार झाला. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे योजनेच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे, हे येथे उल्लेखनीय.

अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचा फटकाजिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींनी कोरोनापूर्वी कुटुंबांची नोंदणी केली. रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज, आराखडा व कामाचे प्राधान्य याकडेही लक्ष दिले होते. ग्रामसभांनी लगेच ठराव पारित केले. मात्र, टाळेबंदीने ग्रामपंचायतींचे नियोजन बिघडविले. सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळावा, अशी आत्मियता जोपसणाºया काही गटविकास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने कामे सुरू होऊ शकली. परंतु, बहुतांश तालुक्यांना केवळ अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचाच फटका बसत आहे.सध्या तरी खरीप हंगामाच्या कामाला वेग आला नाही. टाळेबंदीमुळे मजूर नाईलाजास्तव घरीच आहेत. सर्वच ग्रामसभा मनरेगा कामे सुरू करण्याच्या बाजुने आहेत. मजुरांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळून प्रशासनाने कामे सुरू केल्यास मोठा आधार मिळू शकतो.-साईनाथ कोडापे, उपसरपंच लाठी, ता. गोंडपिपरी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस