शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

Corona Virus in NagpuChandrapur; पायाला फोड आल्याने मजुरांना पायी चालता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:35 IST

संसाराचे गाठोडे पाठीवर आणि चिमुकल्या मुलांना घेऊन आठदहा दिवसापासून त्या मजुरांचा मजलदरमजल जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करीत शेकडो किमी. आंध्र प्रदेश ते बालाघाट असा खडतर प्रवास पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.

ठळक मुद्देपरप्रांतात गेलेल्या मजुरांचा आंध्र प्रदेश ते बालाघाट पायी प्रवास

प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूरसंसाराचे गाठोडे पाठीवर आणि चिमुकल्या मुलांना घेऊन आठदहा दिवसापासून त्या मजुरांचा मजलदरमजल जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करीत शेकडो किमी. आंध्र प्रदेश ते बालाघाट असा खडतर प्रवास पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.कोरोना संकटामुळे जग हादरले आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. कोरोना संसर्गाची लागण टाळण्यासाठी बहुतांश सर्वच कंपन्या बंद करण्यात आल्या आहे.देशात बेरोजगारीचे संकट मोठे आहे. अशातच पोटाचा प्रश्न भागविण्यासाठी मजूर रोजगाराच्या शोधात परप्रांतात गेले होते. सारेकाही व्यवस्थित असताना अचानक आता कोरोनामुळे सर्वच कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे रोजगाराच्या शोधात गेलेल्या मजुरांचे कामच कायमचे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, हाताला काम नाही, जवळ होता तोही पैसा खर्च झाल्यामुळे मजुरांजवळ गावाला जायलाही पैसे उरले नाही. लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद असल्याने परप्रांतात गेलेल्या मजुरांचा गावी जाण्याचा मार्ग धूसर झाल्याने आंध्रप्रदेश राज्यात अडकलेल्या घरची आस लागलेल्या दहा मजुरांनी पायदळ प्रवास सुरू केला. आंध्रप्रदेश राज्यातून बालाघाट (मध्यप्रदेश)येथे पायदळ निघालेले मजूर आठ_दहा दिवसाच्या खडतर पायी प्रवासानंतर राजुरा तालुक्यातील गोवरी येथे पोहोचले. संसाराचा सारा भार डोक्यावर घेऊन एका चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन रडकुंडीला आलेले त्या सर्व मजुरांचे निरागस चेहरे बघणाºया अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते. गोवरी येथील नागरिक किशोर चिल्लरवार यांनी समाज भावनेतून त्यांना स्वत: नाश्त्याची सोय करून दिली. परप्रांतात गेलेल्या या मजुरांकडील सर्व पैसे खर्च झाल्याने त्यांच्याकडे काही खायलाही पैसे नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. गोवरी येथे १५ मिनिटे थांबून कथन केलेला त्या मजुरांचा शेकडो किमीचा पायी प्रवास अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. शेकडो किमीचा पायदळ प्रवास केल्याने मजुरांच्या पायाला फोड आले होते. त्यांना चालताही येत नव्हते. कोरोनामुळे मजुरांच्या नशिबी आलेले भयावह संकट कोणाच्याही वाट्याला येऊ नये, ही उपस्थित गावकऱ्यांनी मनोमन प्रार्थना करीत या मजुरांनी पुन्हा गोवरी मार्गे चंद्रपूर ते बालाघाट असा शेकडो किमीचा पायी प्रवास सुरू केला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस