शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित

By admin | Updated: April 7, 2017 00:56 IST

जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या

काँग्रेसचे निवेदन : बांधकामगारांच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्षचंद्रपूर : जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळत नसल्यामुळे या संबधी लक्ष वेण्याकरीता या संबंधीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे.जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाची स्थिती अत्यंत दयनिय अवस्थेत आहे. येथे कोणताही सक्षम अधिकारी नसल्याने संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना अनेक समस्येला सामोर जावे लागत आहे.महाराष्ट्र राज्याने असंघटित कामगाराकरीता महा. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ २०११ मध्ये सुरू केलेले आहे. परंतु या अंतर्गत येणारे लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या विभागात सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामगार या कार्यालयात दूरवरून येऊन दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. सध्या शासनातर्फे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सुरक्षारक्षक मंडळ, घरेलु कामगार मंडळ व बाल कामगार मंडळ, माथाडी कामगार मंडळ आदींमध्ये नोंदविलेल्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योगामधील कामगाराच्या प्रश्नासंबंधी अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. अनेक दिवसापासुन या विभागात सहा. कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे नियमित भरण्यात यावी. अनेक उद्योगामध्ये कामगारांना सुरक्षा सामुग्री पुरविण्यात येत नाही.या दृष्टिकोनातून कामगार विभागाच्या माध्यमातून नियमित निरीक्षण करणे गरजेचे असतानासुद्धा त्याकडे कामगार विभागाच्या कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने दुर्लक्ष होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा जिल्हा औद्योगिक असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या मंडळांमध्ये नोंदणीकृत असंघटित कामगारांना कल्याणकारी योजनेमध्ये लाभ मिळत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे. अनेक मंडळात भरपूर निधी असतानासुद्धा कामगारांना यापासुन वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सक्षम नियमित अधिकारी देऊन कामगारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणीही देवतळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)