शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित

By admin | Updated: April 7, 2017 00:56 IST

जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या

काँग्रेसचे निवेदन : बांधकामगारांच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्षचंद्रपूर : जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळत नसल्यामुळे या संबधी लक्ष वेण्याकरीता या संबंधीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे.जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाची स्थिती अत्यंत दयनिय अवस्थेत आहे. येथे कोणताही सक्षम अधिकारी नसल्याने संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना अनेक समस्येला सामोर जावे लागत आहे.महाराष्ट्र राज्याने असंघटित कामगाराकरीता महा. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ २०११ मध्ये सुरू केलेले आहे. परंतु या अंतर्गत येणारे लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या विभागात सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामगार या कार्यालयात दूरवरून येऊन दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. सध्या शासनातर्फे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सुरक्षारक्षक मंडळ, घरेलु कामगार मंडळ व बाल कामगार मंडळ, माथाडी कामगार मंडळ आदींमध्ये नोंदविलेल्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योगामधील कामगाराच्या प्रश्नासंबंधी अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. अनेक दिवसापासुन या विभागात सहा. कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे नियमित भरण्यात यावी. अनेक उद्योगामध्ये कामगारांना सुरक्षा सामुग्री पुरविण्यात येत नाही.या दृष्टिकोनातून कामगार विभागाच्या माध्यमातून नियमित निरीक्षण करणे गरजेचे असतानासुद्धा त्याकडे कामगार विभागाच्या कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने दुर्लक्ष होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा जिल्हा औद्योगिक असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या मंडळांमध्ये नोंदणीकृत असंघटित कामगारांना कल्याणकारी योजनेमध्ये लाभ मिळत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे. अनेक मंडळात भरपूर निधी असतानासुद्धा कामगारांना यापासुन वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सक्षम नियमित अधिकारी देऊन कामगारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणीही देवतळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)