शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विहीरगाव उपकेंद्राचे काम पाच वर्षांपासून थंडबस्त्यात

By admin | Updated: August 13, 2015 01:47 IST

शासनाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राज्यातील १४ परिमंडलात ६२३ नवे वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून विदर्भाच्या ११ जिल्ह्यासाठी ११३ नवे वीज उपकेंद्र मंजूर केले आहेत.

सास्ती : शासनाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राज्यातील १४ परिमंडलात ६२३ नवे वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून विदर्भाच्या ११ जिल्ह्यासाठी ११३ नवे वीज उपकेंद्र मंजूर केले आहेत. परंतु यापूर्वीच शासनाने मंजूर केलेले अनेक वीज उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात आहेत. राजुरा तालुक्यातील पाच वर्षांपूर्वी मंजूर केलेले विहीरगाव येथील वीज उपकेंद्राचे काम अजूनही थंडबस्त्यात आहे. अशा मंजूर उपकेंद्राचे काम प्रथम सुरू करावे व नंतरच नवे वीज उपकेंद्र मंजूर करावे, असा टाहो विहीरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी फोडला आहे.राज्यात विजेच्या अनियमित होणाऱ्या पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. पाऊस पडण्याआधी शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक नष्ट झालीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. सिंचनाची सोय उपलब्ध असूनही अनियमित व अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. वीज केंद्रावरुन मोठ्या प्रमाणात कृषी पंपाची जोडणी असल्यामुळे योग्य व नियमित वीज पुरवठा पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे उपकेंद्र स्थापन करणे गरजेचे होते. शासनाने वीज उपकेंद्र मंजूरही केले. परंतु पाच वर्षे लोटूनही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात आहेत व आता नव्याने वीज उपकेंद्र मंजूर करुन शेतकऱ्याची थट्टाच केली जात असल्याचा सूर शेतकऱ्यांकडून निघत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरुर उपकेंद्रावरुन राजुरा तालुक्यातील विहिरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा परिसरातील गावात जवळपास १ हजार १०० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. परंतु हा पुरवठा अनियमित व अपुऱ्या दाबाचा होत असल्यामुळे शेतकरी सिंचनामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन याठिकाणी सन २०१० मध्ये विहिरगाव उपकेंद्र मंजूर केले. २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले होते. तेव्हाही अधिकाऱ्यांनी त्वरित काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही उपकेंद्राचे काम सुरू झाले नाही. आजही परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या अपुऱ्या व अनियमित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु अशा मंजूर उपकेंद्राचे काम सुरू न करता शासन मात्र नव्या वीज उपकेंद्राना मंजुरी देऊन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहे. प्रथम पूर्वी मंजूर केलेल्या वीज उपकेंद्राचे काम सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)शासनासोबतच प्रशासनही करतेय थट्टाप्रस्तावित विहीरगाव उपकेंद्राचे काम एन्फ्रा-२ मध्ये मंजूर झाले असून जागाही निश्चित झाली आहे. अंदाजपत्रक व टेंडरनही झाले आहे. सदर काम अतिआवश्यक यादीत घेऊन मंजुरीसाठी हेड आॅफीसला पाठविले आहे. मंजुरी मिळताच काम सुरू होईल अशी माहिती वीज वितरण कंपनी बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता नितीन चोपडे यांनी मे महिन्यात सांगितले होते. परंतु अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. शासनही मंजूर कामे झाले की नाही हे न बघता नव्या कामांना मंजुरी देते तर प्रशासन लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन देते. दोघेही शेतक्यांची थट्टाच करीत असल्याचे दिसून येते.