शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

धम्मचक्र गतिमान करण्यासाठी कार्य करा

By admin | Updated: October 17, 2016 00:45 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था दूर करण्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला.

भदन्त सुरई ससाई : दीक्षाभूमीवर धम्मप्रवचन कार्यक्रमचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था दूर करण्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला. समाजाला शिका, संघटीत व्हा व समानतेसाठी संघर्ष करण्याचा संदेश दिला. पंचशील व त्रिशरण ग्रहण करून धम्म दीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नातील धम्मचक्र जगावर फिरले नाही. परिणामी धम्म चळवळ काहिशी मंदावल्याचे दिसत आहे. आता मात्र भंतेनी जनतेला विश्वासात घेवून जयभीमचा नारा बुलंद करुन धम्मचक्र गतीमान करण्यासाठी कार्य करण्याचा सल्ला अखिल भारतीय धम्म सेना नायक आर्य नागार्जून सरई ससाई यांनी येथील धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात रविवारी आंबेडकरी जनसमूहाला दिला.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने ६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ पार पडला. यावेळी धम्मप्रवचन कार्यक्रम दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, प्रा. डॉ. नंदवर्धन बोधी महाथेरो, भंते डॉ. वण्णासामी महाथेरो, भंते डॉ. मेतानंद महाथेरो, भंते ज्ञानज्योती, भंते धम्मसारथी, भंते बोधीरत्न, भंते नागोघोष, भंते नागाप्रकाश, भंते नागवंश यांची उपस्थिती होती.आर्य नागार्जून सुरई ससाई पुढे म्हणाले, धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे. बुद्ध काळात धम्माची व्याप्ती वेगळी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी विचारसरणी नष्ट करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला. सामाजिक दु:ख निवारण्यासाठी प्रयत्न केला. समाजात वेगवेगळ्या विचारधारा असल्या तरी सामाजिक प्राप्त करण्यासाठी सर्वांनी संघटीत प्रयत्न करण्याची गरज आहे.जगातील श्रीलंका, जपान, चीन, थायलंड या राष्ट्रासह अन्य राष्ट्रात धम्मचळवळ पोहचविणे आवश्यक आहे. राष्ट्राराष्ट्रात यामुळे मैत्री भावना तयार होण्यास मदत मिळणार आहे. यातूनच सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपणे सोपे जाणार आहे, असेही त्यांनी विचार मांडले. संचालन प्रा. सतीश पेटकर व प्रा. दिलीप रामटेके यांनी तर आभार प्रा. विश्रांती धनांजे यांनी मानले. विपश्चनामुळे धम्माची चळवळ मंदावलीधम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या धम्मप्रवचन समारंभात भंते ज्ञानज्योती यांनी प्रवचन करताना विपश्चना साधनेवर भर दिला. विपश्चना आत्मचिंतन करण्याचे साधन म्हणून त्यांनी उल्लेख केला. यावर प्रहार करताना आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी सांगितले की, भंते चंद्रमणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धम्म दीक्षा देताना त्रिशरण आणि पंचशिल मानवी जीवन जगण्याचे सार असल्याचे नमूद केले होते. काही भंतेनी विपश्चना साधनेचा विपर्यास करुन धम्म चळवळ गतीमान करण्याऐवजी मंदावण्यासाठी मदत करीत असल्याचे भाषणातून सांगितले. भंतेनी पैसा गोळा करण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.