शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र गतिमान करण्यासाठी कार्य करा

By admin | Updated: October 17, 2016 00:45 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था दूर करण्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला.

भदन्त सुरई ससाई : दीक्षाभूमीवर धम्मप्रवचन कार्यक्रमचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था दूर करण्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला. समाजाला शिका, संघटीत व्हा व समानतेसाठी संघर्ष करण्याचा संदेश दिला. पंचशील व त्रिशरण ग्रहण करून धम्म दीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नातील धम्मचक्र जगावर फिरले नाही. परिणामी धम्म चळवळ काहिशी मंदावल्याचे दिसत आहे. आता मात्र भंतेनी जनतेला विश्वासात घेवून जयभीमचा नारा बुलंद करुन धम्मचक्र गतीमान करण्यासाठी कार्य करण्याचा सल्ला अखिल भारतीय धम्म सेना नायक आर्य नागार्जून सरई ससाई यांनी येथील धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात रविवारी आंबेडकरी जनसमूहाला दिला.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने ६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ पार पडला. यावेळी धम्मप्रवचन कार्यक्रम दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, प्रा. डॉ. नंदवर्धन बोधी महाथेरो, भंते डॉ. वण्णासामी महाथेरो, भंते डॉ. मेतानंद महाथेरो, भंते ज्ञानज्योती, भंते धम्मसारथी, भंते बोधीरत्न, भंते नागोघोष, भंते नागाप्रकाश, भंते नागवंश यांची उपस्थिती होती.आर्य नागार्जून सुरई ससाई पुढे म्हणाले, धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे. बुद्ध काळात धम्माची व्याप्ती वेगळी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी विचारसरणी नष्ट करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला. सामाजिक दु:ख निवारण्यासाठी प्रयत्न केला. समाजात वेगवेगळ्या विचारधारा असल्या तरी सामाजिक प्राप्त करण्यासाठी सर्वांनी संघटीत प्रयत्न करण्याची गरज आहे.जगातील श्रीलंका, जपान, चीन, थायलंड या राष्ट्रासह अन्य राष्ट्रात धम्मचळवळ पोहचविणे आवश्यक आहे. राष्ट्राराष्ट्रात यामुळे मैत्री भावना तयार होण्यास मदत मिळणार आहे. यातूनच सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपणे सोपे जाणार आहे, असेही त्यांनी विचार मांडले. संचालन प्रा. सतीश पेटकर व प्रा. दिलीप रामटेके यांनी तर आभार प्रा. विश्रांती धनांजे यांनी मानले. विपश्चनामुळे धम्माची चळवळ मंदावलीधम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या धम्मप्रवचन समारंभात भंते ज्ञानज्योती यांनी प्रवचन करताना विपश्चना साधनेवर भर दिला. विपश्चना आत्मचिंतन करण्याचे साधन म्हणून त्यांनी उल्लेख केला. यावर प्रहार करताना आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी सांगितले की, भंते चंद्रमणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धम्म दीक्षा देताना त्रिशरण आणि पंचशिल मानवी जीवन जगण्याचे सार असल्याचे नमूद केले होते. काही भंतेनी विपश्चना साधनेचा विपर्यास करुन धम्म चळवळ गतीमान करण्याऐवजी मंदावण्यासाठी मदत करीत असल्याचे भाषणातून सांगितले. भंतेनी पैसा गोळा करण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.