शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वादात अडकले रेल्वे उड्डाणपुलाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:45 IST

येथील रेल्वे उड्डाण पुलाची दुरूस्ती केली जात आहे. दुरूस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करायला हवे होते. मात्र पुलाच्या वस्ती भागातील उतार कामाला रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने या पुलाचे काम सुमारे महिनाभरापासून बंद आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर शहर : रहिवाशांचा उतार कामाला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील रेल्वे उड्डाण पुलाची दुरूस्ती केली जात आहे. दुरूस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करायला हवे होते. मात्र पुलाच्या वस्ती भागातील उतार कामाला रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने या पुलाचे काम सुमारे महिनाभरापासून बंद आहे.बल्लापूर शहराच्या मध्यभागातून रेल्वे लाईन गेली आहे. या रेल्वेलाईनमुळे वस्ती विभाग आणि डेपो तथा टेकडी भाग अशा दोन भागात हे शहर आहे. या दोन्ही विभागाला रहदारीने जोडण्याकरिता रेल्वे स्थानकाच्या बाजूला लोखंडी उड्डाणपूल सुमारे ४० वर्षापूर्वी बांधण्यात आले. या पुलावरून रात्रंदिवस लोकांची ये-जा असते. शहरातील अत्यंत महत्त्वाचे हे रहदारीचे ठिकाण आहे.पूल जीर्णावस्थेत आल्यामुळे रेल्वे विभागाने या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. या दुरूस्तीवर एकूण ५० लाख रूपये खर्च होणार आहेत. हा खर्च रेल्वे विभाग २५ लाख आणि बल्लारपूर नगर परिषद २५ लाख रूपये खर्च करीत आहे. पुलाच्या दुरूस्तीचे सुमारे ८० टक्के काम झाले आहे. केवळ वस्ती भागातील पुलाच्या उतार भागाला तोडून तो नव्याने बांधणे बाकी आहे. पुलाच्या जुन्या उतार भागाला तोडून तीन नवीन पिल्लरही उभे करण्यात आले आहेत. परंतु, उतार भागातील जवळपासच्या रहिवाशांनी या कामाला आक्षेप घेत, उतारभाग आमच्या घरासमोर नको, अशी मागणी करीत कामाला विरोध दर्शविला आहे.तसे निवेदन येथील रहिवाशांनी नगर परिषद तसेच रेल्वेच्या संबंधित विभागाकडे दिले आहे. पुलाला उतार भाग न ठेवता, आमच्या घरासमोरील जागा बाधित होऊ नये, याकरिता रेल्वेच्या हद्दीतच पुलाच्या शेवटच्या टोकाला पायऱ्या बनविण्यात याव्यात, असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पुलाचा उतार पूर्वीसारखाच ठेवण्यात यावा, अशी काही जणांची मागणी आहे. परस्पर विरूद्ध असलेल्या लोकांच्या या मागणीच्या पेचात रेल्वे विभाग आणि नगर परिषद प्रशासन सापडले आहे.परिणामी या पुलाचे काम अर्धवट पडले आहे. पावसाळ्यात वर्धा नदीच्या पुराचे पाणी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या कॉलरी रोड तसेच रेल्वेच्या गोल पुलात घुसले की रहदारी बंद होते. अशाप्रसंगी सध्या दुरूस्तीत असलेले रेल्वे उड्डाण पुलच एक पर्याय उरतो. मोठा पाऊस होवून पुराचे पाणी गोल पुलात घुसले तर रहदारीचा प्रश्न शहरवासीयांपुढे उभा राहू शकतो. त्यामुळे काम लवकर पूर्ण करावे.विद्यार्थ्यांना अडचणीबल्लारपूर शहरातील शाळा तसेच महाविद्यालय वस्ती विभाग आणि डेपो विभाग या दोन्ही भागात आहे. त्यामुळे या पुलावरून विद्यार्थ्यांची दिवसभर ये-जा सुरू असते. शाळा-महाविद्यालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपण्याआधीच या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र पुलाचे काम रखडल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण येत आहे.