शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

निधी मिळूनही कामांना प्रारंभच नाही

By admin | Updated: June 23, 2014 00:01 IST

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या नावावर गौडबंगाल सुरू केले. त्यामुळे यंदाही या रस्त्यांची दैना कायम राहणार आहे.

चंद्रपूर : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या नावावर गौडबंगाल सुरू केले. त्यामुळे यंदाही या रस्त्यांची दैना कायम राहणार आहे. ११ कोटी ८५ लाखांचा निधी मिळाला असतानाही अधिकाऱ्यांच्या ढिम्म नियोजनामुळे या कामांना प्रारंभ झाला नाही. परिणामी आता गावखेड्यातील नागरिकांना गुळगुळीत रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी किमान सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.मागील वर्षी जुलै आणि आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत गावखेड्यातील रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. छोटे-मोठे पूल वाहून गेले. अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला. आजही अनेक गावांना जाण्यासाठी नागरिकांना वाट तुडवीतच जावे लागत आहे. साधे सायकलने जायचे झाल्यास त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मध्यंतरीच्या काळात रस्त्यांसाठी निधीची कमतरता होती. त्यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी निधीचे कारण पुढे करीत होते.या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी वारंवार केल्यानंतर बांधकाम विभागाला निधी प्राप्त झाला. पण अधिकाऱ्यांच्या ढिम्म नियोजनामुळे अद्यापही या कामांना प्रारंभ झाला नाही. केवळ अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करुन रस्त्यांची कामे ठप्प पाडल्याचा आरोप आता होत आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तर आता पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि पुन्हा आचारसंहिता लागल्याचे कारण अधिकाऱ्यांनी समोर केले आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे पावसात रस्ते दुरुस्त करणे शक्य नाही.त्यामुळे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आता सहा- सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत गावखेड्यातील नागरिकांना रस्त्यांची प्रतीक्षा व मनस्ताप सहन करावा लागेल. यास बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आहे. (शहर प्रतिनिधी)