चंद्रपूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट खंडित करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. दरम्यानच्या काळात कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश नसल्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाणे सक्तीचे करू नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यानी शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पत्राद्वारे केली. त्यानंतर शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश निर्गमित केले.
कोरोना संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे ब्रेक द चेन मिशन अंतर्गत शासनाने १४ एप्रिलच्या सायंकाळी आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आदेश निर्गमित केले आहे. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा व महाविद्यालय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाची दुसरी लाट तोडण्यासाठी शासनाने कठोर पावले उचललेली आहेत. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, शाळा, प्राथमिक शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहोत. त्यामुळे संचार बंदीच्या काळात शिक्षक कर्मचाऱ्यांनी शाळेत जावे की ,नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता. शाळेत उपस्थित राहण्याबाबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत वेगवेगळे जिल्ह्यातील पत्र सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. याबाबत विविध शिक्षक संघटनांनी सुद्धा शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे. ९ एप्रिल रोजी काढलेल्या संदर्भीय पत्रान्वये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना संसर्ग जिल्ह्यात प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे शिक्षकांना या कालावधीत वर्क फ्रॉम होम काम करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर आडबले यांनी केली व त्यांच्या मागणीला यश आले.