शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

थंडबस्त्यात असलेला चौपदरी महामार्गाचे काम मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST

सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा या दोन चौपदरी महामार्गांच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली ...

सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा या दोन चौपदरी महामार्गांच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली आहे. २०१९ मध्ये भूमिपूजनानंतर थंडबस्त्यात असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर भेटीत समस्या मांडली व याची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेत प्रकल्प सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले.

त्यामुळे अंदाजे एक हजार ९०० कोटी प्रस्तावित किंमत असलेल्या या चौपदरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले आहे. याबाबत गॅझेट नोटिफिकेशन ३१ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झाले. यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवित झालेली आहे.

या प्रकल्पाबाबत जमीन भुअर्जन करण्यासाठी व इतर समस्या मार्गी काढण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्ताकडे ३ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता.

चंद्रपूर-बल्लारशा-राजुरा-लक्कडकोट ते तेलंगणा राज्य सीमेपर्यंत असलेला चारपदरी महामार्ग क्र. ९३०-डी या महामार्गाचे बामणी - लक्कडकोट ते राज्य सीमेपर्यंत अंदाजे ३३ किलोमीटर लांबीचा रस्ता व बामणी ते कोरपना आदिलाबाद सीमेपर्यंत जुळणाऱ्या ५६ किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी अंदाजे एक हजार ९०० कोटी खर्च येणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तीन महामार्गाचे भूमिपूजनही बामणी येथे करण्यात आले होते. त्यानंतर बामनी ते आष्टी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली व ते काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, बामणी ते लक्कडकोट व बामणी ते कोरपना आदिलाबाद महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला होता. या महामार्गाच्या कामाचा प्राधान्यक्रमही बदलण्यात आलेला होता.

हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्त्वाचे व आंतरराज्य वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. मात्र, आता या मार्गाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. हा महामार्ग पूर्णत्वास आल्यास राजुरा, कोरपना व गडचांदूर शहरासोबत महामार्गालगतच्या गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो.